शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाच्या एम्पिरिकल डाटा जमा करून तो तत्काळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाच्या एम्पिरिकल डाटा जमा करून तो तत्काळ न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र राज्य सरकारने न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले, तरी अजूनही साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठनदेखील केले नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे, राज्य सरकारने याबाबत हालचाल केली नाही तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ डिसेंबरला नंतरदेखील आपल्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दहा ते बारा तारखा दिल्या. एकही तारखेला सरकार न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पूर्तता करून न्यायालयात हजर राहिले नाही आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घातले नाही. गेल्या पंधरा महिन्यांत भाजपचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जवळपास पाच ते सात वेळा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने अनेक वेळा पत्र देण्यात आले. एकाही पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, तसेच कोणतीही कारवाई देखील करण्यात आली नाही.

ओबीसी समाजाला देखील क्षुल्लक समजत आहात, एवढेच नाही तर आपल्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान केला जातो आहे. याचा फटका ओबीसी समाजाला बसला आहे. गेली पंधरा महिने सरकार फक्त कोर्टात जाऊन पुढची तारीख मागत होते. लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करावी तसेच झाली नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.

या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश पश्चिम महासंपर्क प्रमुख नंदकुमार यादव, नगरसेवक विजयकुमार काटवटे, सुनील काळेकर, शेखर लोखंडे, करण पोरे, तानाजी चव्हाण, अमोल भुजबळ, भारत जंत्रे, गीताताई लोखंडे, वनिता पवार, महेंद्र कदम, तानाजी चव्हाण, अण्णा कारंडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.