शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी महाविद्यालये व्हेंटिलेटरवर

By admin | Updated: September 1, 2014 00:06 IST

संस्था अडचणीत : विद्यार्थी शिष्यवृत्तीऐवजी शासनाने आर्थिक अनुदान द्यावे

सातारा : पुणे-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण देणाऱ्या पदवी व पदविका संस्थांची दयनीय अवस्था झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा ४० टक्के जागा रिक्त असल्यामुळे महाविद्यालये आर्थिक अडचणीत सापडली आहेत.१९८३-८४ नंतर झपाट्याने खासगी तंत्रनिकेतनची संख्या वाढू लागली. राज्यात, जिल्ह्यात व अनेक ग्रामीण स्तरावर तंत्रनिकेतने उभी राहू लागली. स्थानिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. पात्र व अनुभवी शिक्षक वर्ग, नवनवीन उपकरणे व पुस्तके, इमारत यावर होणारा खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने तंत्रशिक्षण दुष्टचक्रात अडकले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी महाविद्यालयाची आर्थिक कोंडी झाली आहे. सातारा जिल्ह्यात २४ महाविद्यालयांमध्ये ७ हजार ६२१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो. वास्तविक चित्र खूपच विदारक आहे. यावर्षी ३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे तर ३ हजार ९२१ जागा अद्याप रिक्तच आहेत.तंत्रशिक्षणाशी संबंधित सर्वच घटक हवालदिल झाले आहेत. अनेक संस्थाचालकांनी मोठी कर्जे काढून तंत्रशिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्जाचे हप्ते व व्याजाची रक्कमही भरता न येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे वेतन अद्यापही प्रलंबित असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.शासनाने या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलावे व आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून द्यावे, असे तंत्रशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मतप्रवाह आहेत. (प्रतिनिधी)शिष्यवृत्ती नको अनुदान द्याशासन फी सवलत व शिष्यवृत्ती यासाठी हजारो कोटी रूपये दरवर्षी खर्च करते. तीच रक्कम अनुदान स्वरूपात करून खासगी तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी महाविद्यालयांना टप्प्याटप्प्याने अनुदानित केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. शासनाने या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलावे व तंत्रशिक्षणाला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून द्यावे, असा मतप्रवाह आहे. मागासवर्गीय व आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासनाकडून फी सवलत व शिष्यवृत्ती देण्यात येते. ही रक्कम एकुण फीच्या अंदाजे ५० ते ६० टक्के पर्यंत आहे. ही रक्कम वर्षाच्या शेवटी मार्च, एप्रिल महिन्यात अदा करण्यात येते. त्यामुळे वर्षभर संस्थेची आर्थिक कोंडी होते व आर्थिक नियोजन कोलमडून जाते, असे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यास त्यांचीही परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत असल्याचे संस्थाचालक सांगतात. विद्यार्थ्यांची पाठ का?शिक्षण घेणाऱ्यांची संख्या आणि नोकरीतील संधी या आकड्यात तफावतव्यवस्थापन क्षेत्रात तुलनेने उत्तम संधीअभियांत्रिकी पदवी मिळविण्यासाठी खर्ची घालावी लागतात पाच ते सात वर्षेविशिष्ट क्षेत्रातच संधीच्या मर्यादा असल्यामुळे आर्थिक मंदीत अन्यत्र कुठेही नोकरी न मिळणं