शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

अभियंतेही ठाकले तलाठीपदाच्या रांगेत!

By admin | Updated: September 11, 2015 21:18 IST

ऐकावं ते नवलच : जिल्ह्यात ‘अण्णासाहेबां’च्या ५२ जागांसाठी तब्बल २० हजार ६८५ उमेदवार देणार परीक्षा--लोकमत विशेष

सातारा : सरकारी नोकरीचा मोह उच्चशिक्षितांनाही चुकला नाही. दिवसेंदिवस बेकारीच्या झळा वाढू लागल्या असल्याने मेंदू आणि मनगटाला काम मिळेना झाले आहे. यातूनच इंजिनिअरची पदवी घेतलेली मुले-मुलीही मिळेल ती नोकरी पत्करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातूनच सातारा जिल्हा महसूल विभागातील तलाठी पदाच्या ५२ जागांसाठी चक्क २० हजार ६८५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. येत्या १३ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.तलाठी पदासाठी खरेतर पात्रता आहे कुठल्याही शाखेचा पदवीधर. त्याव्यतिरिक्त कुठलीही पात्रता त्यासाठी लागत नाही. मात्र, दिवसेंदिवस बेकारी वाढत असल्याने स्पर्धा वाढत असल्याचे पुढे येत आहे. तलाठी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर एक लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गणित, सामान्यज्ञान, मराठी, इंग्रजी या विषयांवर प्रश्न विचारले जातात. इंजिनिअरिंग झालेली मुले गणितात अव्वल असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही परीक्षा म्हणजे नोकरी मिळण्याचे हुकमी साधन ठरते. सातारा जिल्ह्यात अभियांत्रिकीची नावाजलेली महाविद्यालये आहेत; पण यातून बाहेर पडणाऱ्या इंजिनिअर्सना साताऱ्यात नोकरी नाही, अशी स्थिती आहे. काही महिन्यांपूर्वी एका चांगल्या कंपनीने साताऱ्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे शेकडो तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. जिल्ह्यातील रोजगार कमी होत चालला असताना मुले पर्यायी नोकऱ्यांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारी खात्यातील शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत जी परीक्षा मिळेल, त्याला सामोरे जाण्याचे प्रत्येकाचे धोरण पाहायला मिळते. बेरोजगारीच्या चटक्यांची जाणीव करून देणाऱ्या या घडामोडी सातारकर युवकांच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)वीस टक्के मुले पदव्युत्तर गुणवत्ताधारक!तलाठी परीक्षेसाठी २० टक्के मुले पदव्युत्तर पदवी घेतलेले आहेत. त्यापैकी ५ टक्के मुलांनी इंजिनिअरिंग केलेले आहे. अनेकांनी आयटीआय करून नोकरीचा शोध घेतला; मात्र पदवी हातात घेऊन सरकारी नोकरीचा शोध सुरू केला आहे. साताऱ्यात गुणवत्ता संपादन करणाऱ्यांना नोकरीच मिळत नसल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट होत आहे.मी इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. नोकरीसाठी औद्योगिक कंपन्यांमध्ये अर्ज करून ठेवले आहेत. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले; आता मात्र ४ हजार रुपये पगार परवडत असेल तर नोकरी करा, अशी कंपन्यांची अट आहे. वय आहे तोपर्यंत सरकारी नोकरी शोधणार आहे.- संदीप कुंभार, इंजिनिअर