शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भांडेवाडीचं अतिक्रमण विधानसभेत गाजलं

By admin | Updated: October 12, 2015 00:30 IST

राजकीय दबाव : गायरानात बांधलेले घर पाडण्यासाठी चक्क तीन आमदारांनी लावली प्रतिष्ठा पणाला

खटाव : अतिक्रमणाचा विषय म्हटलं तर स्थानिक पातळीवरही काही मिनिटांत निकाली काढण्यासारखा; पण भांडेवाडीतील गायरानावरील अतिक्रमण भलतंच गाजलं. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह तीन आमदारांनी विधानसभेत हा विषय अतारांकित बनविला आहे. दरम्यान, ‘अतिक्रमणाच्या नावाखाली शेतकऱ्यावर राजकीय आकसातून अन्याय केला जात आहे,’ असा आरोप वयोवृद्ध शेतकरी जयराम फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.राज्यभर खळबळ निर्माण करणाऱ्या घटनेची माहिती अशी की, भांडेवाडी येथे गायरान जमिनीवर घर बांधून अतिक्रमण केल्याबद्दलजयराम गणू फडतरे यांना घर पाडण्याचा शासनाचा आदेश आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांचा मुलगा राजेंद्र फडतरे यांचे घर पाडण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाचा आदेश एकाच्या नावे आणि पाडण्याची प्रकिया दुसरीकडे असे चित्र निर्माण झाले आहे. जयराम फडतरे यांनी ‘माझ्या नावे आदेश असल्यामुळे माझे घर पाडले तरी माझी कोणतीच हरकत नाही,’ असे यापूर्वीही सांगितले आहे. परंतु त्यांच्या मुलाच्या नावाने कोणताच आदेश किंवा नोटीस नसताना त्याचे घर पाडण्यासंबंधीच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.’ वास्तविक पाहता शासनाच्या गायरानावर केवळ जयराम फडतरे यांचे घर नसून अन्य ३३ जणांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. मग एकट्या जयराम गणू फडतरे यांनाच का वेठीस धरले जात आहे. हाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. विधानसभेत आमदार शशिकांत शिंदे, मोहोळचे आमदार रूपेश कदम, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत भांडेवाडीमधील गट नं ४०९ मध्ये रस्त्यावर अतिक्रमण झाल्याबाबत ‘अ’ तारांकित प्रश्नसातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भांडेवाडी येथील गट क्रमांक ४०९ मध्ये अतिक्रमण झाले आहे. येथे अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले असल्यामुळे येथील रस्ता बंद झाला आहे. या रस्त्यामध्ये झालेले अतिक्रमण काढण्यासाठी खटाव (वडूज)चे तहसीलदारांनी गट विकास अधिकाऱ्यांना १८ सप्टेंबर २०१४ रोजी पत्राद्वारे कळविले आहे. अतिक्रमण केलेले असल्यास गट विकास अधिकाऱ्यांनी ते काढलेले नसल्यास त्याची कारणे काय आहेत.अतिक्रमण काढण्यासाठी कोणती उपाययोजना केली. या संदर्भात अतारांकित प्रश्न विधानसभेत मांडण्यात आल्यानंतर तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत फडतरवाडी यांचे मार्फत जयराम फडतरे यांच्या नावे आदेश काढून त्यांना दिला. प्रशासनाचा आदेश एकाचे नावे घर पाडण्याच्या हालचाली दुसऱ्याचे अशा हालचाली वेग धरू लागल्या आहेत. (वार्ताहर)३२ अतिक्रमणे सोडून फडतरेच ‘टार्गेट’गायरानावर अतिक्रमण झाले असल्याचे सांगत माझे घर पाडण्याचा आदेश ग्रामपंचायतीने दिला आहे. मी घर पाडण्यास तयार आहे. माझ्या नावाचा आदेश असताना याच गट क्रमांकात माझ्या मुलाच्या नावे असणारे घर पाडण्याचा घाट का घातला जात आहे. माझ्याबरोबर इतर ३३ लोकांचे त्याच गायरानावर अतिक्रमण असताना त्यांना कोणतीच नोटीस नाही. परंतु, मला मात्र आदेश काढून घर पाडण्यासंदर्भात दबाव आणला जात आहे. मोजणीत १७० उंबरे अतिक्रमणात येत आहेत. त्यांच्यावर काय कार्यवाही करणार आहेत. अतिक्रमणात येणाऱ्या सर्वांना वगळून फक्त माझ्याच नावाने विधानसभेत तारांकित प्रश्न कसा विचारला गेला. हा तर सरासर अन्याय आहे. आमच्या कुटुंबावर अन्याय झाला तर मी आत्मदहन करणार आहे, असा इशाराही शेतकरी जयराम फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घर पाडण्यासाठी हालचालीफटतरे यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून घर पाडण्याचा घाट केला जात आहे. ग्रामपंचायत भांडेवाडीकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३ अन्वये अतिक्रमण काढण्याचे व अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. तरीही ठोस कारवाई केली जात नसल्याच्या लेखी पत्रामुळे ग्रामपंचायतीतर्फे घर पाडण्याच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे.