शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

खळे येथील बंधारा दुरुस्ती करूनही रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:39 IST

ढेबेवाडी : वांग नदीवर खळे (ता. पाटण) नजीक बारा वर्षांपासून रखडलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा यावर्षी पूर्ण झाला. यामुळे लाभक्षेत्रातील ...

ढेबेवाडी

: वांग नदीवर खळे (ता. पाटण) नजीक बारा वर्षांपासून रखडलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा यावर्षी पूर्ण झाला. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली; मात्र बंधाऱ्याच्या कामात त्रुटी राहिल्याने पाणी अडवूनही बंधारा कोरडाच पडत आहे. धरणातून पाणी सोडूनही येथील शेतकऱ्यांच्या आशेवर बंधाऱ्यातील गळतीचे पाणी फिरल्याने कडाक्याच्या उन्हाळ्यात पिकेही कोमेजत आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खळे येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व्हावा, अशी या परिसरातील शेतकऱ्यांची फार पूर्वीपासून मागणी होती; मात्र शासनाने फारसे गांभीर्याने घेतले नाही. पुढे वांग मराठवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रात दहा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे नियोजन झाले. प्रकल्पाचे काम वेगाने होत असले तरी काम रेंगाळलेलेच राहील.

बारा वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊन बांधकामाचा शुभारंभ झाला. काही प्रमाणात काम झाले; मात्र पुढे निधीची उपलब्धता ही समस्या निर्माण होत बंधाऱ्याने काम रखडले. राजकीय स्थित्यंतरात हे काम रखडतच राहिले. अखेर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून बंधाऱ्यांसाठी निधीची उपलब्धता होऊन गेल्या दोन वर्षांपूर्वी काम सुरू झाले. बंधारा पूर्ण झाला.

बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन तो पाणीसाठा

करण्यासाठी योग्य झाला. यंदा प्रथमच रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडून बंधाऱ्यात पाणीसाठा केला; पण गळतीमुळे बंधाऱ्यात पाणी राहिले नाही. बंधारा कांही दिवसात रिकामा झाला. त्यानंतर गळती काढण्याचा प्रयत्न झाला; पण गळती निघालीच नाही. २५ मार्च रोजी दुसऱ्या आवर्तनासाठी सोडलेल्या पाण्यामुळे बंधाऱ्यातून सगळीकडून पाण्याची गळती सुरू आहे. काही प्लेटस् वाहून गेल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी या निकृष्ट कामाचा पंचनामा केला. त्यानंतरही बंधारा दुरुस्तीचा केविलवाणी प्रयत्न झाला.

आता बंधाऱ्यात पाणी साठा होईल म्हणून शेतकऱ्यांनी बंधाऱ्याकडे नजरा लावल्या; पण गळती थांबली नसल्याने पाणी साठा झाला नाही. निकृष्ट कामामुळेच ही गळती होत आहे, असा आरोप करून याची चौकशी करा व गळती काढा, अशी मागणी होत आहे.

फोटो रविंद्र माने यांनी मेल केला आहे.

खळे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यास सगळीकडेच गळती असल्यामुळे पाणी वाहून जात आहे. (छाया : रवींद्र माने)