शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

तुळशी अन् चंदनाच्या पानाने दिला रोजगार

By admin | Updated: July 4, 2017 14:47 IST

मंदिराबाहेरील चित्र : हंगामी व्यावसायिकांनी केली भक्तांची सोय

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0४ : हंगामी व्यावसायिकांना यंदाही विठ्ठलाचा आधार मिळाला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना आवश्यक असणारे तुळशी अन् चंदनाची पाने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी यंदाही दिवसाला हजारो रूपये कमवुन आषाढी साजरी केल्याचे चित्र शहरातील मंदिराबाहेर पहायला मिळाले.देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरला विठ्ठलाकडे घातले. ज्या भक्तांना पंढरीला जाता आले नाही त्यांनी शहर व परिसरात असणाऱ्या मंदिरांमध्ये जावुन विठ्ठु रखमाईचे दर्शन घेतले. विठ्ठल दर्शनाला आवश्यक असणारे तुळशी अन् चंदनाचे पान विक्रीने यंदाही उच्चांक केली आहे. शहरातील मंदिराबाहेर सातशेहुन अधिक भक्तांनी पाच रूपयात याची खरेदी करून ते विठ्ठल चरणी अर्पण केल्याचे विक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तुळशी पानांची तजवीजविठ्ठलाच्या दर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या तुळशीच्या पानांची तजवीज हंगामी व्यवसायिकांनी केली होती. शहर परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर तुळशीची रोपे असतात. पावसाळ्यात तुळशी चांगली फुटते म्हणून त्याची छाटणी केली जाते. अनेक व्यावसायिक आषाढीच्या आदल्या दिवशी ही छाटणी करतात. छाटणी केल्याच्या मोबदल्यात त्यांना तुळशीची पाने मिळतात, ही पाने दुसऱ्या दिवशी पाच रूपयांच्या दराने विकली जातात.

शहरात तुळशी विकतचीच!

निसर्गाच्या सानिध्यात सातारा वसले असले तरी वाढत्या अपार्टमेंटच्या जंगलामुळे आता दारातील तुळशी वृंदावनाची जागा गॅलरीतील तुळशीच्य रोपांनी घेतली आहे. पुरेशा सुर्यप्रकाशाअभावी ही रोपं खुरटीच राहतात. त्यामुळे गॅलरीत तुळस असुनही शहरात विठुरायाच्या भेटीसाठी जाताना तुळशी विकतचीच घ्यावी लागते.

चंदनाच्या पानांची कमतरता

शहर व परिसरात चंदनाच्या झाडांची लागवड अल्प आहे. जिथे कुठे चंदनाचे झाड वाढलेले दिसते, त्यावर रात्री चोरटे कुऱ्हाडी मारतात. त्यामुळे यंदाही चंदनाच्या पानांची कमतरता जाणवली. त्यामुळे यंदाही तुळशीच्या पाच पानांबरोबर एक चंदनाचे पान विक्रीस होते.

सत्तर रूपयांच्या भांडवलात सहाशेचा नफा!

सातारा शहरात प्रथमच मंदिराबाहेर चंदनाचा टिळा लावणाऱ्या व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. पायी दिंडीत ठिकठिकाणी हातात गंधाचा डबा आणि नामाचा आकार असलेला साचा घेवुन फिरणारे व्यावसायिक यंदा शहरातील मंदिरांच्या बाहेरही दिसली. मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना आडवून विठ्ठल सेवेच्या नावाखाली हा गंध लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. एखाद्या भक्ताने किती द्यायचे विचारले की ‘स्वेच्छेने पाच रूपये द्या’ हे वाक्य ठरलेलं. या व्यावसायिकांनीही सत्तर रूपयांच्या भांडवलात सहाशे रूपये कमावले हे विशेष!यंदा तुळशी अन् चंदनाच्या पानांना ग्राहकांची चांगलीच मागणी होती. सकाळी ६ वाजल्यापासुन सहाशे जुड्या विकल्या. संध्याकाळपर्यंत हजार जुड्या विकल्या जातील. - सुनिता साळुंखे, हंगामी व्यावसायिक