शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

लोकांच्यात गैरसमज पसरवून भावना दुखावू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

वडूज : जिहे-कठापूर योजनेतून खटाव तालुक्यातील ११ गावे वगळण्यात आली नसून तसा कोणी लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये. तसेच ...

वडूज : जिहे-कठापूर योजनेतून खटाव तालुक्यातील ११ गावे वगळण्यात आली नसून तसा कोणी लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये. तसेच या ११ गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठांच्या माध्यमातून ठोस पाठपुरावा केला जाईल,’ असे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय काळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, राजेंद्र कचरे, बाळासाहेब पोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नंदकुमार मोरे म्हणाले, ‘खटाव तालुक्यातील पूर्व भागातील लोकांना जिहे-कठापूरचे पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसह जे बरोबर येतील त्यांना घेऊन व्यापक चळवळ उभारली जाईल. लवकरच आमदार शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून मंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर बैठक लावण्यात येणार आहे. खटाव तालुक्यातील सर्व भागाला पाणी मिळणे हे गरजेचे आहे. मात्र या प्रश्नी कोणीही राजकारण करू नये. आमदार शिंदे, मंत्री पाटील यांना तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तर या प्रश्नी सर्व मतभेद विसरून तळमळीने काम करण्याचे आवाहन ही त्यांनी केले.’

यावेळी प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, डॉ. संतोष देशमुख, बाळासाहेब पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शैलेश वाघमारे, डॉ. प्रकाश पाटोळे, संतोष तारळकर, पोपट पाटील, पोपट जगदाळे, शिवाजी साबळे, शैलेश वाघमारे, विनोद मोहिते, सागर चंदनशिवे यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

-----------------------------------