शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

आमदार नामधारी... कर्ते-करवितेच सत्ताधारी!

By admin | Updated: June 15, 2014 00:14 IST

राजनिष्ठेचा यशस्वी प्रयोग : मग कसं?... राजे म्हणतील तसं!

सचिन जवळकोटे ल्ल साताराफलटणचे भाग्यविधाते कोण? रामराजे. फलटणचे सर्वेसर्वा कोण? रामराजे. फलटणचे कर्तेकरविते कोण? रामराजे. अन् फलटणचे आमदारही कोण? रामराजेच! होय... फलटणमधल्या कोणत्याही लहान मुलाला विचारलं तर तो हेच सांगेल की ‘फलटणचे आमदार रामराजेच!’आता तुम्ही म्हणाल, ‘मग मंत्रालयाच्या अधिकृत यादीत आमदार म्हणून दीपक चव्हाण यांचं नाव दिसतंय, ते कोण?’ अहो... ते तर निव्वळ नामधारी आमदार; कारण कर्ते-करवितेच घेतात, इथं प्रत्येक निर्णय आर या पार! मात्र काहीही म्हणा; ‘राजनिष्ठा’ किती प्रामाणिक असू शकते, हे इथल्या विद्यमान आमदारांनी फलटणच्या जनतेला दाखविलं राव.फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रामराजेंनी आपल्याच शाळेतला एक शिक्षक हेरला. ‘सत्तेची राजवस्त्रं’ नेसवून आमदारही केलं. मनात आणलं तर आपण एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती मोठं करू शकतो, हे ही रामराजेंनी यातून दाखवून दिलं. विशेष म्हणजे, याची परतफेड चव्हाणांनीही मोठ्या इमानेईतबारे केली. तालुक्यातल्या विकासकामांच्या निधीबाबत कुणी चर्चा केली तर ‘रामराजेंना भेटा किंवा संजूबाबांना विचारा!’ ही एकच ठरलेली कॅसेट ऐकवली.शाळेतल्या मस्टरवर त्यांनी जितक्या सहजपणे सह्या केल्या, तेवढ्याच विश्वासानं बंगल्यात ठेवलेल्या लेटरहेडवरही सह्या ठोकल्या. ‘मग कसं?’ असं कुणी विचारलं तर मोठ्या कौतुकानं ‘राजे म्हणतील तसं!’ एवढंच तोंडपाठ झालेलं उत्तर दिलं; परंतु यातून एक फायदा असा झाला की, तालुक्यातल्या गावोगावच्या समस्यांची खडान्खडा माहिती असलेल्या रामराजेंनी गेल्या पाच वर्षांत समतोल प्रमाणात निधी खर्ची आणला.यंदा मात्र परिस्थती वेगळी. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भलतंच जेरीस आणलेलं. ‘काँग्रेसला सोबत घेतलं नाही तर काय होऊ शकतं,’ याची चुणूकही दाखविलेली, कारण लोकसभेचा निकाल फलटणमध्ये भूकंप घडवून गेलेला. शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत या तालुक्यात ६०६ मतांचं आधिक्य घेऊन गेलेले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे बुरुज अनेक ठिकाणी ढासळलेले. अशा परिस्थितीत विधानसभेला आपल्या उमेदवाराचा चेहरा लोकांसमोर आणताना रामराजेंना खूप विचार करावा लागणार. खूप कसरत करावी लागणार. कारण, काँग्रेसचे दिगंबर आगवणे हेही बंडाच्या पावित्र्यात. लोकसभेला मुख्यमंत्र्यांचे ऐकणारे रणजितसिंह आता विधानसभेला शांत राहतील, याची शाश्वती खूपच कमी. अशातच आगवणे हे गिरवीचे म्हणजे, चिमणरावांच्याच गावचे. (गावाकडचा माणूस म्हणे कधीही जवळचाच असतो!)असो. शिवसेनेचे बाबूराव माने यांनीही पुन्हा एकदा ‘बाणाची प्रत्यंचा’ ताणण्याचा मनसुबा जाहीर केलाय. त्यामुळं लढत तिरंगी होणार, हे निश्चित. मात्र, उत्सुकता एवढीच की, लोकसभेतल्या खोतांची अकडेवारी पुन्हा गिरवली जाणार की, रामराजेंची खरी ताकद विधानसभेत दिसून येणार!