शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आमदार नामधारी... कर्ते-करवितेच सत्ताधारी!

By admin | Updated: June 15, 2014 00:14 IST

राजनिष्ठेचा यशस्वी प्रयोग : मग कसं?... राजे म्हणतील तसं!

सचिन जवळकोटे ल्ल साताराफलटणचे भाग्यविधाते कोण? रामराजे. फलटणचे सर्वेसर्वा कोण? रामराजे. फलटणचे कर्तेकरविते कोण? रामराजे. अन् फलटणचे आमदारही कोण? रामराजेच! होय... फलटणमधल्या कोणत्याही लहान मुलाला विचारलं तर तो हेच सांगेल की ‘फलटणचे आमदार रामराजेच!’आता तुम्ही म्हणाल, ‘मग मंत्रालयाच्या अधिकृत यादीत आमदार म्हणून दीपक चव्हाण यांचं नाव दिसतंय, ते कोण?’ अहो... ते तर निव्वळ नामधारी आमदार; कारण कर्ते-करवितेच घेतात, इथं प्रत्येक निर्णय आर या पार! मात्र काहीही म्हणा; ‘राजनिष्ठा’ किती प्रामाणिक असू शकते, हे इथल्या विद्यमान आमदारांनी फलटणच्या जनतेला दाखविलं राव.फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रामराजेंनी आपल्याच शाळेतला एक शिक्षक हेरला. ‘सत्तेची राजवस्त्रं’ नेसवून आमदारही केलं. मनात आणलं तर आपण एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती मोठं करू शकतो, हे ही रामराजेंनी यातून दाखवून दिलं. विशेष म्हणजे, याची परतफेड चव्हाणांनीही मोठ्या इमानेईतबारे केली. तालुक्यातल्या विकासकामांच्या निधीबाबत कुणी चर्चा केली तर ‘रामराजेंना भेटा किंवा संजूबाबांना विचारा!’ ही एकच ठरलेली कॅसेट ऐकवली.शाळेतल्या मस्टरवर त्यांनी जितक्या सहजपणे सह्या केल्या, तेवढ्याच विश्वासानं बंगल्यात ठेवलेल्या लेटरहेडवरही सह्या ठोकल्या. ‘मग कसं?’ असं कुणी विचारलं तर मोठ्या कौतुकानं ‘राजे म्हणतील तसं!’ एवढंच तोंडपाठ झालेलं उत्तर दिलं; परंतु यातून एक फायदा असा झाला की, तालुक्यातल्या गावोगावच्या समस्यांची खडान्खडा माहिती असलेल्या रामराजेंनी गेल्या पाच वर्षांत समतोल प्रमाणात निधी खर्ची आणला.यंदा मात्र परिस्थती वेगळी. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भलतंच जेरीस आणलेलं. ‘काँग्रेसला सोबत घेतलं नाही तर काय होऊ शकतं,’ याची चुणूकही दाखविलेली, कारण लोकसभेचा निकाल फलटणमध्ये भूकंप घडवून गेलेला. शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत या तालुक्यात ६०६ मतांचं आधिक्य घेऊन गेलेले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे बुरुज अनेक ठिकाणी ढासळलेले. अशा परिस्थितीत विधानसभेला आपल्या उमेदवाराचा चेहरा लोकांसमोर आणताना रामराजेंना खूप विचार करावा लागणार. खूप कसरत करावी लागणार. कारण, काँग्रेसचे दिगंबर आगवणे हेही बंडाच्या पावित्र्यात. लोकसभेला मुख्यमंत्र्यांचे ऐकणारे रणजितसिंह आता विधानसभेला शांत राहतील, याची शाश्वती खूपच कमी. अशातच आगवणे हे गिरवीचे म्हणजे, चिमणरावांच्याच गावचे. (गावाकडचा माणूस म्हणे कधीही जवळचाच असतो!)असो. शिवसेनेचे बाबूराव माने यांनीही पुन्हा एकदा ‘बाणाची प्रत्यंचा’ ताणण्याचा मनसुबा जाहीर केलाय. त्यामुळं लढत तिरंगी होणार, हे निश्चित. मात्र, उत्सुकता एवढीच की, लोकसभेतल्या खोतांची अकडेवारी पुन्हा गिरवली जाणार की, रामराजेंची खरी ताकद विधानसभेत दिसून येणार!