शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

टंचाईच्या काळात उधळपट्टी!

By admin | Updated: November 13, 2015 23:43 IST

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पाईपलाईनला गळती; अंधाऱ्या रात्री हजारो लिटर पाणी वाया

शाहूपुरी : येथील शिवाजी नगर कॉलनी परिसरात प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली असून, अंधाऱ्या रात्रीत दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.एकीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळग्रस्त पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर शाहूपुरी परिसरात गेले अनेक महिन्यांपासून प्राधिकरणाच्या अनेक पाईपलाईनला शिवाजीनगर, समतापार्क, जवाहर कॉलनी येथे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गळती लागल्यामुळे हा परिसर चिखलमय झाला असून, पाय घसरत असल्याने तेथून चालणेही धोकादायक बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हीच परिस्थिती असूनही याकडे प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे. सध्या पावसाने मारलेली दडी चिंताग्रस्त असून, पाण्याचे साठे खालावत चालले आहेत. अशा परिस्थितीत हजारो लिटर पाण्याची नासाडी न परवडणारी आहे. वारंवार असे प्रकार घडत असूनही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. गळती लागल्यामुळे वाहनचालक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. घाणीतूनच विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. गळती लागल्यामुळे हे पाणी रस्त्याच्या उताराने जात आहे. याठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी करसत करावी लागत आहे. वाहने घसरण्याचे प्रमाणही वाढतच चालले आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने वेळेतच लक्ष घालून येथील पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पाणी बचतीचे महत्त्व प्राधिकरणला कधी कळणार, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (वार्ताहर)पाणीटंचाई यंदा लवकरच!या वर्षी राज्यात सर्वत्र अपुरा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात तर परतीचा पाऊसही म्हणावातसा पडला नाही. दर वर्षी जाणवणारा पाणीटंचाई या वर्षी जानेवारीपासूनच जाणवू लागेल, अशी चिन्हे आहेत. सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर पाणी जपून वापरण्याचा सल्ला नागरिकांना वारंवार दिला जात आहे. यापार्श्वभूमीवर गळती रोखणे हे संबंधित यंत्रणांचे कर्तव्य ठरते. मात्र, सातारा शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर सुरू असून ही एकप्रकारे पाण्याची उधळपट्टीच ठरते.