शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

प्रश्नांचा भडीमार झाल्याने अधिकाऱ्यांची तंतरली!

By admin | Updated: September 4, 2016 00:34 IST

कऱ्हाडला आमसभा : ग्रामस्थांनी मांडल्या गावच्या समस्या; लोकप्रतिनिधींकडून अधिकारी धारेवर

कऱ्हाड : तालुक्यातील अनेक गावांतील गावठाणांचे प्रलंबित प्रश्न, बेकायदेशीरपणे करण्यात आलेले अतिक्रमण, कऱ्हाड-ओगलेवाडी, विद्यानगर या रस्त्यांचे झालेले निकृष्ट काम तसेच शेताच्या बांधांचे प्रश्न याकडे शासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले दुर्लक्ष अशा एक ना अनेक तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. यावेळी ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले.कऱ्हाडमध्ये शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी आमसभा पार पडली. त्यावेळी अधिकाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या. संतापलेल्या नागरिक व ग्रामस्थांनी शासकीय विभागाविषयी इतक्या प्रचंड संख्येने समस्या आणि गाऱ्हाणी मांडली की, सभेस उपस्थित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील चकीत झाले. तब्बल पाच तास चाललेल्या या आमसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या चुकीच्या कामांचा पाढा वाचला. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे, जिल्हा परिषद सदस्या विजयमाला जगदाळे, पंचायत समिती सभापती देवराज पाटील आदींसह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी २०१५ मध्ये झालेल्या सभेचा वृत्तांत वाचून दाखविला. त्यानंतर पंचायत समितीच्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान, शामगावच्या उपसरपंचांनी शामगाव येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या तलावर बांधकामाचे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. तसेच योजना गावपातळीवर राबवत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती देऊनच ती राबवावी, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी याबाबत योजना राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्थांची मीटिंग घेण्यात येईल, असे सांगितले. तालुक्यात करण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे हा चुकीचा असल्याचे अप्पासाहेब गायकवाड यांनी सांगितले. तसेच पुन्हा यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी केली. तर कार्वे येथील तंटामुक्ती अध्यक्ष मारुती जाधव यांनी कार्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.यावेळी प्रशांत यादव यांनी शासनाने मंजूर केलेल्या कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. जमिनी संपादित करताना शासनाकडून त्याचा मोबदला नक्की किती दिला जाणार, याबाबत त्यांच्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे याची माहिती घेणे गरजेचे असल्याचे सांगत कऱ्हाड-विटा मार्गावर ओगलेवाडी ते कृष्णा कॅनॉलपर्यंतच्या कामात अनेक त्रुटी आहेत. ठेकेदाराकडून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. याबाबत संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून काहीच उपाययोजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे या रस्ता कामाचा ठेकेदार तत्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी यादव यांनी केली. तर सैदापूर येथील मोहन जाधव म्हणाले, ‘बनवडी, विद्यानगर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे सैदापूर येथील जुन्या ब्रिटिशकालीन कॅनॉलमधून दुर्गंधीयुक्त बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे स्थानिक गरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय सैदापूर येथील ग्रामपंचायतीकडून कृष्णा नदीपात्रात कचरा टाकल्याने नदीप्रदूषणही होत आहे,’ असे सांगितले. त्यावर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकामांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून मार्ग काढू, असे सांगितले. आ. पृथ्वीराज चव्हाण, शंभूराज देसाई व आनंदराव पाटील यांनी तक्रारींचे निवारणाबाबत लोकांना आश्वासने दिली; परंतु तक्रारींची संख्या वाढतच गेल्यामुळे अनेकांना त्यांचे म्हणणे अखेर निवेदनाच्या स्वरूपातच मांडावे लागले. (प्रतिनिधी)