शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

पार्थिवास रस्ता देण्यास लाजिरवाणा विरोध

By admin | Updated: February 10, 2016 23:37 IST

शहीद सूर्यवंशी : मस्करवाडीला करावी लागणार सुपुत्राची आणखी प्रतीक्षा

म्हसवड : सियाचीनमधील हिमस्खलनामुळे वीरमरण आलेले मस्करवाडी (ता. माण) येथील जवान सुनील विठ्ठल सूर्यवंशी यांच्या पार्थिवासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बदलत्या हवामानामुळे झालेल्या या विलंबाने ग्रामस्थांची घालमेल होत आहे; मात्र प्रतिकूल वातावरणात मायभूमीची सेवा करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या सुपुत्राच्या पार्थिवास रस्ता देण्यास शेतकऱ्याने विरोध केल्याची लाजिरवाणी घटना घडल्याने मस्करवाडीकरांच्या दुर्दैवात भर पडली.सियाचीनमधील हवामान बदलल्याने पार्थिव आणण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती सूर्यवंशी यांचे ज्येष्ठ बंधू तानाजी सूर्यवंशी यांनी दिली. ते लष्करी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत पार्थिव साताऱ्यात आणले जाण्याची शक्यता आहे. सियाचीनमधील हवामान अचानक बदलल्याने पार्थिव आणण्यास विलंब होत असून, ग्रामस्थ आणि सूर्यवंशी कुटुंबीयांची घालमेल होत आहे.दरम्यान, मस्करवाडी गावच्या सीमेवरील दोन शेतकऱ्यांचा रस्त्यावरून अनेक वर्षांचा वाद आहे. पार्थिव आणण्यासाठी रस्ता रुंद करावा लागणार असून, त्यास एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने पार्थिवाचीही वाट बिकट झाली. हा रस्ता दोन्ही शेतकऱ्यांच्या जमिनींच्या हद्दीमधून जातो. हद्दीवरून दोघांचा वाद अनेक वर्षे सुरू आहे. बुधवारी रस्ता मोठा करण्यासाठी जेसीबी पाठविण्यात आला, त्यावेळी एका शेतकऱ्याने जेसीबीच्या दिशेने दगड भिरकावल्याने मस्करवाडीतील वातावरण गंभीर बनले.देशासाठी प्राण देणाऱ्या सुपुत्राला रस्ताही न देण्याचा लाजिरवाणा प्रकार प्रथमच घडत असावा. संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये खडाजंगी सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे यांनी शिष्टाई करून सर्वांना प्रसंगाचे गांभीर्य राखण्याची विनंती केली. सुनील सूर्यवंशी शहीद झाल्याचे जाहीर होताच सैनिक स्कूलच्या अधिकाऱ्यांनी अंत्यविधीच्या जागेची पाहणी केली. त्या जागेची ग्रामपंचायतीकडून सफाई सुरू आहे. सुनील यांच्या मातोश्री आणि पत्नी यांना दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली नसल्याचे तानाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. गावच्या सुुपुत्राचे अंत्यदर्शन लवकर व्हावे यासाठी ग्रामस्थ आतुरले आहेत. (प्रतिनिधी)प्रशासनालाही नाही गांभीर्यमस्करवाडीचा सुपुत्र देशाच्या सुरक्षेसाठी शहीद झाला असतानाच महसूल यंत्रणा, बांधकाम विभाग, पोलीस यंत्रणा यापैकी कोणत्याही विभागाचे अधिकारी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मस्करवाडीत फिरकलेच नव्हते. जवानाच्या बलिदानाचे प्रशासनाला गांभीर्य आहे की नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. प्रशासकीय यंत्रणेने अंत्यविधीची तयारी कुकुडवाड ग्रामपंचायतीकडे दिली आहे. ग्रामपंचायतीचे प्रयत्न अपुरे पडत असून, रस्ता दुरुस्त करण्यासारखी कामे बांधकाम विभागाची असताना या विभागाचे कोणीही गावाकडे फिरकले नाही. संपूर्ण गाव या घटनेने सुन्न झाले असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र झोपी गेल्याचे दिसून येत आहे.तनयाचे रडणे असह्यसुनील सूर्यवंशी यांची एक वर्षाची मुलगी तनया बुधवारी दिवसभर रडत होती. लहान मूल वारंवार रडत असले, तरी तनयाचे आजचे रडणे ग्रामस्थांना असह्य होत होते. तिला तिच्या पित्याची आठवण तर येत नसेल ना, असे भावनिक होऊन बोलले जात होते.