शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डोंगरावरच्या रानभाज्यांची मुंबईकरांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:00 IST

लक्ष्मण गोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबामणोली : बामणोली व तापोळ्याच्या डोंगररांगांमध्ये उगवलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या ग्रामस्थांना खुणावू लागल्या आहेत. औषधी अन् दुर्मीळ असलेल्या या रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून देवाण-घेवाण सुरू झाली असून, या भाज्यांचे महत्त्व जाणणारे मुंबई येथील रहिवाशांकडून या भाज्यांना मागणी वाढू लागली आहे.कास, बामणोली, तापोळा हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. घनदाट ...

लक्ष्मण गोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबामणोली : बामणोली व तापोळ्याच्या डोंगररांगांमध्ये उगवलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या ग्रामस्थांना खुणावू लागल्या आहेत. औषधी अन् दुर्मीळ असलेल्या या रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून देवाण-घेवाण सुरू झाली असून, या भाज्यांचे महत्त्व जाणणारे मुंबई येथील रहिवाशांकडून या भाज्यांना मागणी वाढू लागली आहे.कास, बामणोली, तापोळा हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. घनदाट जंगलांची व्यापलेल्या येथील डोंगररांगांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती आजही आढळून येतात. या वनस्पतींबरोबरच केवळ पावसाळ्यात उगवणाºया रानभाज्याही अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. या भाज्या दुर्मीळ, औषधी अन् पौष्टिक असल्याने पावसाळ्यात या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश केला जातो. पावसाळा नुकतान सुरू झाला असून, विविध प्रकारच्या रानभाज्या डोंगरांगांमध्ये उगवू लागल्या आहेत.यामध्ये प्रामुख्याने शेंडवल, वाघचौडा, सक्रोबा (भारंगी) रानअळू, फरसुंगी, काटवेल, टाकळा, मासाळ या रानभाज्या डोंगरात उगवल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थ या भाज्यांचा आहारात समावेश करू लागले आहेत. या भाज्यांचे महत्त्व जाणणारे ग्रामस्थ एकमेकांना व नातेवाइकांना या भाज्यांची देवाणघेवाण करू लागले आहे. एवढेच नव्हे तर मुंबई व सातारा येथे राहणाºया नागरिकांकडूनही या भाज्या खाण्यासाठी मागविल्या जात आहेत. स्थानिक शेतकºयांकडून या भाज्यांची बाजारपेठत विक्री केली जात आहे. भाज्यांबरोबर रान अळंबी व भोपीडही उगवू लागली आहे. रान अळंबीची भाजी तसेच आमटीही केली जाते.आरोग्याला लाभदायक...या रानभाज्यांपैकी अनेक भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. यापैकी सक्रोबा भारंगी ही भाजी पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी आहे.रान अळू ही रक्तवाढीसाठी तसेच कुरडू ही भाजी मूळव्याधीवर बहुगुणी मानली जाते. या भाज्या म्हणजे आजीबाईचा बटवा समजल्या जातात.रानभाज्या आरोग्याला लाभदायक असल्याने घरातील वयस्कर मंडळी तरुण पिढीला या भाज्या खाण्यासाठी आग्रह करत असतात.