शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शाळा सोडल्याचा दाखला देण्यातील संभ्रम दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा : मुख्याध्यापकांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दहावीची परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ...

दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा : मुख्याध्यापकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दहावीची परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोणती तारीख आणि शेरा नोंद करायचा, याबाबत माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश मुख्याध्यापकांनी दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा नोंदवून दाखला देत आहेत.

गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. त्यानंतर अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकमधील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आदी कागदपत्रे मिळविण्याची पालक, विद्यार्थ्यांकडून प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दहावीची अंतिम लेखी परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोणती तारीख, शेरा नोंदविण्याबाबतची अडचण मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाली. शासनाकडूनही त्याबाबत कोणत्याही सूचना नव्हत्या. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तारीख, शेरा नोंदविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापकांना गेल्या चार दिवसांपूर्वी दिल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांकडून कार्यवाही सुरू आहे.

पॉइंटर

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : ८२६

दहावीतील नोंदणी झालेले विद्यार्थी : ४०१६६

मूल्यांकन प्राप्त विद्यार्थी : ४०१६५

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ४०१३४

मुख्याध्यापक काय म्हणतात?

दि. ३१ मे २०२१ अशी शाळा सोडल्याची तारीख, पुढील वर्ग नसल्याने असा शेरा नोंद करून विद्यार्थ्यांना दाखला देण्यात येत आहे.

- मिथिला गुजर, मुख्याध्यापक

मागणीनुसार दाखला दिला, पुढील वर्ग नसल्याने अशी कारणांची नोंद करून शाळा सोडल्याच्या दाखल्याचे वितरण केले जात आहे.

- अमित कुलकर्णी, हिंदवी स्कूल

पालक म्हणतात

माझी मुलगी खाजगी हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षणासाठी तिचा तेथील ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जाणार आहे. त्यामुळे दाखला घ्यावा लागणार नाही.

- तुषार पाटील, करंजे

माझा मुलगा दहावी उत्तीर्ण झाला आहे. अजून त्याच्या पुढील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केलेली नाही. शाळेतून दाखला मिळविण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

- पल्लवी जाधव, मंगळवार पेठ

एकच शेऱ्याबाबत सूचना

शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांसमवेत मुख्याध्यापक महामंडळाच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनुसार प्रत्यक्ष निकाल पत्रक वेगळे असणार आहे. त्यामुळे शाळांना दाखल्यावर एकसारखा शेरा, तारीख नोंदविण्याबाबत मुख्याध्यापकांना मार्गदर्शक सूचना केली असल्याची माहिती गुरुकुल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सांगितले.

पॉइंटर

शाळा सोडल्याचा दाखल्यातील नोंदी

शाळा सोडल्याचे कारण : मागणीनुसार दाखला दिला, पुढील वर्ग नसल्याने, शिक्षणासाठी अन्यत्र गेला यापैकी एक

शेरा : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एस. एस. सी. (इयत्ता दहावी) परीक्षा उत्तीर्ण.

शाळा सोडल्याची तारीख : दि. ३१ मे २०२१