शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाळा सोडल्याचा दाखला देण्यातील संभ्रम दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा : मुख्याध्यापकांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दहावीची परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ...

दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा : मुख्याध्यापकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दहावीची परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोणती तारीख आणि शेरा नोंद करायचा, याबाबत माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश मुख्याध्यापकांनी दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा नोंदवून दाखला देत आहेत.

गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. त्यानंतर अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकमधील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आदी कागदपत्रे मिळविण्याची पालक, विद्यार्थ्यांकडून प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दहावीची अंतिम लेखी परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोणती तारीख, शेरा नोंदविण्याबाबतची अडचण मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाली. शासनाकडूनही त्याबाबत कोणत्याही सूचना नव्हत्या. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तारीख, शेरा नोंदविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापकांना गेल्या चार दिवसांपूर्वी दिल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांकडून कार्यवाही सुरू आहे.

पॉइंटर

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : ८२६

दहावीतील नोंदणी झालेले विद्यार्थी : ४०१६६

मूल्यांकन प्राप्त विद्यार्थी : ४०१६५

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ४०१३४

मुख्याध्यापक काय म्हणतात?

दि. ३१ मे २०२१ अशी शाळा सोडल्याची तारीख, पुढील वर्ग नसल्याने असा शेरा नोंद करून विद्यार्थ्यांना दाखला देण्यात येत आहे.

- मिथिला गुजर, मुख्याध्यापक

मागणीनुसार दाखला दिला, पुढील वर्ग नसल्याने अशी कारणांची नोंद करून शाळा सोडल्याच्या दाखल्याचे वितरण केले जात आहे.

- अमित कुलकर्णी, हिंदवी स्कूल

पालक म्हणतात

माझी मुलगी खाजगी हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षणासाठी तिचा तेथील ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जाणार आहे. त्यामुळे दाखला घ्यावा लागणार नाही.

- तुषार पाटील, करंजे

माझा मुलगा दहावी उत्तीर्ण झाला आहे. अजून त्याच्या पुढील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केलेली नाही. शाळेतून दाखला मिळविण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

- पल्लवी जाधव, मंगळवार पेठ

एकच शेऱ्याबाबत सूचना

शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांसमवेत मुख्याध्यापक महामंडळाच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनुसार प्रत्यक्ष निकाल पत्रक वेगळे असणार आहे. त्यामुळे शाळांना दाखल्यावर एकसारखा शेरा, तारीख नोंदविण्याबाबत मुख्याध्यापकांना मार्गदर्शक सूचना केली असल्याची माहिती गुरुकुल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सांगितले.

पॉइंटर

शाळा सोडल्याचा दाखल्यातील नोंदी

शाळा सोडल्याचे कारण : मागणीनुसार दाखला दिला, पुढील वर्ग नसल्याने, शिक्षणासाठी अन्यत्र गेला यापैकी एक

शेरा : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एस. एस. सी. (इयत्ता दहावी) परीक्षा उत्तीर्ण.

शाळा सोडल्याची तारीख : दि. ३१ मे २०२१