शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

महाराष्ट्रातील धरणांवर क्रांतिदिनी संघर्षाचा एल्गार

By admin | Updated: August 2, 2015 00:11 IST

भारत पाटणकर : दुष्काळ, धरण, पवनचक्कीग्रस्तांच्या संघर्षाची सुरुवात

सातारा : ‘राज्य शासनाकडे पुनर्वसन, दुष्काळ निर्मूलन व एकात्मिक पाणी वापराचा आराखडा पूर्वीच मांडला आहे. पण, भाजप सरकारही दुष्काळ, पुनर्वसन तसेच पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नाही. आघाडी शासनाप्रमाणेच याही सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचेच ठरवलेले दिसत असून, येत्या ९ आॅगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्रातील धरणांवर व पवनचक्क्यांच्या डोंगरांवर प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार आहेत,’ अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘दुष्काळग्रस्त, धरणग्रस्त व पवनचक्कीग्रस्त आपापल्या प्रकल्पांच्या ठिकाणी जमून तीव्र संघर्षाचा एल्गार करणार आहेत. धरणग्रस्तांच्या पर्यायी जमिनी आणि दुष्काळग्रस्त कोरडवाहू शेती करणाऱ्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतांना अजूनही पाण्याचा लाभ झालेला नाही. मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊनही प्रत्यक्षात शेता-शेतावर पाणी पोहोचविण्याची यंत्रणा ५०-५० वर्षांनंतरही होत नाही. सरकारने निधी देऊन योजना पूर्ण केल्या पाहिजेत. या पाणीसाठ्यामध्ये ज्यांची गावे आणि जमिनी बुडाल्या त्यांचे पुनर्वसनही केले पाहिजे, तसे झाले नाही तर पावसाळ्यानंतर हजारोंच्या संख्येने आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येणार आहे. पवचक्कीग्रस्त शेतकऱ्यांना भाडेपट्टा मिळाला पाहिजे. पण, तो मिळत नाही. एकूणच दुष्काळग्रस्त, पवचनचक्कीग्रस्त व धरणग्रस्त शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार वर्षानुवर्षे सुरूच आहे. त्यामुळे हे आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)