शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

किसनवीरची निवडणूक लढविण्याचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

शिरवळ : किसनवीर आबांच्या नावाने सुरू असलेला कारखाना बंद पडू नये ही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर आमची धारणा आहे. चंगळवादामुळे ...

शिरवळ : किसनवीर आबांच्या नावाने सुरू असलेला कारखाना बंद पडू नये ही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर आमची धारणा आहे. चंगळवादामुळे कारखाना अडचणीत आला आहे. राज्य शासनाने शेतकरी बांधव अडचणीत येऊ नये याकरिता कारखाना सुरू करण्यासाठी ३० कोटी रुपये भागभांडवल दिले म्हणून गेल्यावर्षी उशिराने का होईना कारखाना सुरू होऊ शकला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून कारखाना वाचविण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास करून सांगतो असे त्यांनी सांगितले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताकरिता व किसनवीर आबांच्या नावाचा कारखाना वाचविण्याकरिता कारखान्याची निवडणूक लढविण्याचाच एल्गार वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांनी केला आहे.

शिरवळ (ता. खंडाळा) येथील न्यू कॉलनी याठिकाणी आमदार मकरंद पाटील यांच्या आमदार फंडातून समाजमंदिर व सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या जिल्हा परिषद सेस फंडातून सुशोभिकरण करण्यात आलेल्या सत्यज्योत तरुण मंडळाच्या समाज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले होते.

आमदार मकरंद पाटील म्हणाले, किसनवीर कारखान्यासमोरील अडचणी आम्ही पाहत आहोत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्नदेखील करत आहोत. त्यामुळे आम्ही शांत आहोत असे कोणीही समजू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हांला आता पुढाकार घ्यावाच लागणार आहे. याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून पुढील आठवड्यात बैठक होण्याचीही शक्यता आहे. या बैठकीवेळी किसनवीर कारखान्याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उदय कबुले म्हणाले, आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून शिरवळमध्ये विकासाचा डोंगर उभा करता आला आहे. सध्या गावामध्ये बिनबुडाचे पुढारी गावात वावरत असून त्यांचे सरकार असताना शिरवळसाठी एक रुपयाही आणता आला नाही ते आता विकासाची वल्गना करीत आहेत अशी जोरदार टीका त्यांनी केली.

याप्रसंगी खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आदेश भापकर, शिरवळ ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे, विकास तांबे, सचिन राऊत, रिजवाना काझी, आशा कारळे, प्रकाश परखंदे, शिरवळ शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष चंद्रकांत मगर, राष्ट्रवादी युवक शिरवळ शहराध्यक्ष समीर काझी, बाळासाहेब जाधव, अमृत पिसाळ, ताहेर काझी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी राजेंद्र तांबे, आदेश भापकर, अजय चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते बालसत्यज्योत तरुण मंडळाच्या समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. मोहन कासुर्डे यांनी आभार मानले.