शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाईच्या पश्चिम भागात रोज आठ तास भारनियमन

By admin | Updated: February 10, 2015 23:56 IST

शेतकरी त्रस्त : भारनियमन बंद करण्याची मागणी

वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या एक महीन्यापासून आठ तास लोडशेडींंग करण्यात येत आहे. लोडशेडिंगमुळे शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भारनियमन कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरण अभियंत्यांना निवेदनाद्वारे केली आहे.वाई तालुक्यातील पश्चिम भागात महावितरण कंपनीने कोणतीही पुर्व सूचना न देता गेल्या एक महीन्यापासून भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे शेतातील गहू, ज्वारी व हरभरा ही पीके वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा सिंगल फेज असताना पश्चिम भागात आठ तासाचे भारनियमन करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या वाई तालुक्यात वार्षिक यात्रा सूरू झाल्या असून भारनियमनामुळे याचा फटका यात्रांनाही बसत आहेत तसेच दहावी , बारावीच्या वार्षिक परिक्षा जवळ आल्याने विदयार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे जागत आहे़ अन्यायकारक भार नियमन महावितरण कंपनीने तत्काळ बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर काळेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ज्ञानदेव सणस, अध्यक्षा सुभद्राताई सणस, सरपंच शंकर सणस, रामचंद्र तुपे, प्रकाश वाडकर, चंद्रकांत सणस, माजी उपसभापती चंद्रकांत सणस, नाना चिकणे , महेंद्र गुरव यांच्यासह बोरगांव, आसरे, खावली, वेंलंग, रेणावळे, कोंढावळे, गाढवेवाडी, किंरूडे, वयगांव, घेरा केंजळ या गावातील ग्रामस्थांच्या सह्या आहे. (प्रतिनिधी)पीके तोंडाशी आली असताना भारनियमन सुरु झाले आहे. शेतीसह शाळेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. महावितरणने भारनियमन तत्काळ बंद करुन शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची होणारी परवड थांबवावी- रामचंद्र तुपे, शेतकरीसध्या शेतीपंपाला वीजेची मागणी वाढल्यामुळे भारनियमन करावे लागत आहे. भारनियमन कमी करण्याबातत लवकरच तोडगा काढण्यात येईल.- एस. के. पाटील,अतिरिक्त कार्यकारी अभियंता