शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

‘हत्ती’ मारणार आजपासून धडका!

By admin | Updated: August 2, 2016 00:59 IST

अतिवृष्टीची शक्यता : आश्लेषा नक्षत्रास मंगळवारपासून प्रारंभ

सातारा : पुष्य नक्षत्रातील पावसानं सातारा जिल्ह्यातील नागरिकांना खरोखर म्हाताऱ्यासारखंच रूप दाखवलं. पंधरा दिवसांत फारसा पाऊस झालाच नाही. शेवट-शेवट अधूनमधून सरी कोसळत होत्या. या पावसानं सर्वांनाच आभाळाकडे बघायला लावलं होतं. परंतु मंगळवार, दि. २ पासून आश्लेषा नक्षत्र सुरू होत आहे. त्याचे वाहन हत्ती असून, नक्षत्राला सुरुवात होण्यापूर्वीच धडका मारायला हत्तीनं सुरुवातही केली आहे. यंदा पर्जन्यमान चांगले असणार आहे. पावसाला वेळेतच सुरुवात होईल आणि नियमित पर्जन्यमानापेक्षा १०४ ते ११५ टक्के अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व पर्जन्यविषयक काम करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सर्वांनाच हायसे झाले होते. सहा महिन्यांपासून पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत असलेल्या ग्रामस्थांनी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पडलेल्या पावसामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आर्द्रा नक्षत्राला दि. २१ जूनला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन उंदीर होते. सुरुवातीचा पाऊस पश्चिम भाग असलेल्या सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांत चांगला पडतो; पण उंदराने शेतकऱ्यांना दगा दिलाच. कोठेही पावसाचा जोर नसल्याने ओढे, नाले, नदी कोरडेच होते. आजही अनेक भागांतील कूपनलिका कोरड्या आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट आहे. पुनर्वसूचे वाहन असलेल्या कोल्ह्याने अपेक्षेप्रमाणे धुमाकूळ घातला; पण पुष्य नक्षत्राने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सूर्य मंगळवार, दि. २ रोजी रात्री ९ वाजून १ मिनिटांनी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्याचे वाहन हत्ती आहे. हत्ती धडका देईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारपासून तर पावसाचा जोर वाढला असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (प्रतिनिधी)दोन दिवस अतिवृष्टीमध्य महाराष्ट्रात दि.२ ते ४ आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या कालावधीत सुमारे ७० मिलिमीटरच्या आसपास पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याचाही मध्य महाराष्ट्रात समावेश होत असल्याने सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील हजारो नागरिकांना एसएमएस पाठवून सावधानतेचा इशारा दिला आहे.कोयनेची मदार ‘आश्लेषा’वरजून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर हे पावसाचे महिने. त्यातील जून, जुलै महिना संपला तरी कोयना धरणात केवळ ६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आश्लेषाचा चांगला पाऊस झाला तर लवकरच धरण भरू शकते. त्यामुळे धरणाची मदार आश्लेषा नक्षत्रावर आहे.सावधानतेचा इशाराया नक्षत्रात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली जात असून, काही ठिकाणी नुकसानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता पंचांगकर्त्यांनी वर्तविली आहे. त्यांच्या मते २, ३, ४, ६, ७, १०, १२, १३, १४, १५ आॅगस्ट रोजी चांगला पाऊस होतो.