शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तारळे भागातील ५६ गावांचे वीज कनेक्शन तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:26 IST

सातारा : वीजबिल थकल्याने पाटण तालुक्यातील तारळे भागातील ५६ गावांचे बुधवारी दिवसभरात वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ...

सातारा : वीजबिल थकल्याने पाटण तालुक्यातील तारळे भागातील ५६ गावांचे बुधवारी दिवसभरात वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ही सर्व गावे अंधारात राहणार आहेत.

तारळे भागामध्ये महावितरणच्या पथदिव्यांची ८० कनेक्शन आहेत. या वीजबिलांची १ कोटी ७६ लाख २८ हजार रुपये थकबाकी आहे. यातील बुधवारी दिवसभरात ५६ गावांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे ही सर्व गावे आता अंधारात गुडूप झाली आहेत. तसं पाहिलं तर तारळे भाग हा दुर्गम भागांमध्ये मोडतो. या भागामध्ये हिंस्त्र प्राणी, साप असे प्राणी रात्री बाहेर पडतात. त्यामुळे पथदिव्यांची अत्यंत गरज असते. त्यातच सध्या पावसाळा सुरू झाला आहे. असे असताना पथदिवे बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वर्षाचा कर भरलेला असतानाही आता किती दिवस ग्रामस्थांना अंधारात बसावे लागणार, याची शाश्वती कोणालाही देता येईना. रात्री-अपरात्री काही कामानिमित्त घराबाहेर यावे लागले तर हिंस्त्र प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे पथदिवे आवश्यकच आहेत. थकीत वीजबिल भरण्यासंदर्भात महावितरणने अनेकदा संबंधित ग्रामपंचायतींना तोंडी व लेखी नोटीसही पाठवली. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी दिवसभरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन वीज कनेक्शन तोडली. यामुळे डोंगर वस्तीवर असणारी गावे अंधारमय झाली आहेत. थकीत वीजबिलांची रक्कम एक कोटींच्या वर असल्यामुळे ही रक्कम ग्रामपंचायतीला भरावी लागणार आहे. काही ग्रामपंचायतींनी वर्षभर वीजबिल भरले नाही. सध्या कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. त्यामुळे लोकांना दळणवळणाच्या सुविधेसाठी हे पथदिवे सुरू राहणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतींनी हे वीजबिल तातडीने भरले नाही तर गावोगावी ग्रामस्थांमधून उठाव होऊन ग्रामपंचायतीवर मोर्चे काढले जातील. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने थकीत वीजबिल भरावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

(कोट)

तारळे भागामध्ये ८० कनेक्शन आहेत. यातील ५६ गावांचे वीज कनेक्शन बुधवारी तोडण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतींनी वीजबिल भरलेले नाही. संबंधितांना वारंवार तोंडी व लेखी नोटीसही पाठवल्या. मात्र, तरीसुद्धा वीजबिल भरले नाही. त्यामुळे सरतेशेवटी आम्हाला वीज कनेक्शन तोडावे लागले. जोपर्यंत वीजबिल भरत नाहीत, तोपर्यंत आम्ही वीज कनेक्शन सुरू करणार नाही.

- आर. वाय. धर्मे, सहाय्यक अभियंता, महावितरण विभाग, तारळे, तालुका पाटण