शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रीक गाड्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

बॅटऱ्या दुरुस्तीतून रोजगार निर्मिती इलेक्ट्रीक गाड्यांत सर्वात महत्त्वाचे काम बॅटऱ्या करत असतात. त्याच नसतील तर गाडी जागेवर बसून असते. ...

बॅटऱ्या दुरुस्तीतून रोजगार निर्मिती

इलेक्ट्रीक गाड्यांत सर्वात महत्त्वाचे काम बॅटऱ्या करत असतात. त्याच नसतील तर गाडी जागेवर बसून असते. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत. यासाठी त्यांनी कोठेही फार मोठे प्रशिक्षण घेतलेले नाही. इलेक्ट्रीक क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय थाटला आहे. यामध्ये दिल्लीहून विविध बॅटऱ्यांचे सुटे भाग आणले जातात. ते एकमेकांना जोडून या बॅटऱ्या बनविल्या जातात. सुरुवातीस लहान लहान पाच सहा बॅटऱ्या जोडल्या जात होत्या. त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या समोर आल्याने आता एकच बॅटरी बनवून देऊ लागले आहेत. सातारा औद्योगिक वसाहतीत असे अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. पूर्वी पेट्रोल-डिझेल गाड्यांची दुरुस्ती करणारे कारागिरही आता या व्यवसायाकडे वळाले आहेत.

चौकट

सार्वजनिक वाहतुकीतही संधी

सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्रात एसटीचा दबदबा आहे. मात्र, कोरोनामुळे एसटीची चाके जागेवर थांबली होती. त्यामुळे एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. ते पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न एसटीचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत. मात्र, सध्या तरी एसटीचे आर्थिक गणित जुळेनासे झाले आहे. डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. त्यातच एसटीच्या ताफ्यात अलिकडील काही वर्षांत दाखल झालेल्या शिवशाही, शिवनेरी गाड्या वातानुकुलीत आहेत. त्या गाड्या बसस्थानकात लागल्यानंतर बंद करुन चालत नाहीत. त्यामुळे अशा गाड्यांना डिझेलचा वापर जास्त होतो. त्यामुळे अनेकदा डिझेलचा खर्च तरी निघेल का नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने इलेक्ट्रीक गाड्या रस्त्यावर आणण्याचा संकल्प केला आहे. यामुळे डिझेलवर होणारा मोठ्या खर्च वाचणार आहे. मात्र, एसटीसमोर सध्या काही अडचणी भासत आहेत. सातारा जिल्हा हा डोंगर उताराचा आहे. यामुळे गाड्यांना घाट चढून जाण्यासाठी जास्त ताकद लागते. यामुळे सातारा जिल्ह्यात हा प्रयोग कितपत यशस्वी होऊ शकतो. हे सांगता येत नाही. कारण बॅटऱ्या मध्येच डिस्चार्ज झाल्या तर काय करायचे ही समस्या आहे. मात्र, घाट रस्ता वगळून या गाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो.

पर्यावरणाचे संवर्धन

कासला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या ठिकाणी उगवणारी फुले अन्य कोठेही पाहायला मिळत नाहीत. अशावेळी निसर्गाकडून सातारकरांना लाभलेल्या अमूल्य देणगीचे जतन, संवर्धन करणे प्रत्येक सातारकराचे कर्तव्य आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कासचा प्रचार व प्रसार झाल्याने जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक दाखल होत आहेत. ही बाब गौरवास्पद आहे. मात्र, त्याचवेळी हजारो गाड्या दररोज पठारावर येतात. धूर ओकणाऱ्या गाड्यांमुळे निसर्गावर घाला येत असतो. हे येथील निसर्गासाठी घातक आहे. अनंत मुंडीवाले विभाग नियंत्रक असताना त्यांनी केवळ कास पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन मिनीबसची सोय केली होती. तेव्हा एसटी महामंडळाने कास, महाबळेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळी इलेक्ट्रीक गाड्या नेऊन ठेवल्या तर तेथेच त्यांचा वापर चांगला करता येऊ शकतो. यामुळे एसटीचे उत्पन्न वाढेल आणि प्रदूषणापासून निसर्गाचे होणारे नुकसानही टाळण्यासाठी मदत होऊ शकते.

कोट :

साताऱ्याला निसर्गानेही भरभरुन निसर्गसंपदा दिली आहे. त्याचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करुन विजेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक गाड्यांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

- प्रा. डॉ. दादासाहेब नवले, सातारा.