शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

इलेक्ट्रीक गाड्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

बॅटऱ्या दुरुस्तीतून रोजगार निर्मिती इलेक्ट्रीक गाड्यांत सर्वात महत्त्वाचे काम बॅटऱ्या करत असतात. त्याच नसतील तर गाडी जागेवर बसून असते. ...

बॅटऱ्या दुरुस्तीतून रोजगार निर्मिती

इलेक्ट्रीक गाड्यांत सर्वात महत्त्वाचे काम बॅटऱ्या करत असतात. त्याच नसतील तर गाडी जागेवर बसून असते. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत. यासाठी त्यांनी कोठेही फार मोठे प्रशिक्षण घेतलेले नाही. इलेक्ट्रीक क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय थाटला आहे. यामध्ये दिल्लीहून विविध बॅटऱ्यांचे सुटे भाग आणले जातात. ते एकमेकांना जोडून या बॅटऱ्या बनविल्या जातात. सुरुवातीस लहान लहान पाच सहा बॅटऱ्या जोडल्या जात होत्या. त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या समोर आल्याने आता एकच बॅटरी बनवून देऊ लागले आहेत. सातारा औद्योगिक वसाहतीत असे अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. पूर्वी पेट्रोल-डिझेल गाड्यांची दुरुस्ती करणारे कारागिरही आता या व्यवसायाकडे वळाले आहेत.

चौकट

सार्वजनिक वाहतुकीतही संधी

सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्रात एसटीचा दबदबा आहे. मात्र, कोरोनामुळे एसटीची चाके जागेवर थांबली होती. त्यामुळे एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. ते पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न एसटीचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत. मात्र, सध्या तरी एसटीचे आर्थिक गणित जुळेनासे झाले आहे. डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. त्यातच एसटीच्या ताफ्यात अलिकडील काही वर्षांत दाखल झालेल्या शिवशाही, शिवनेरी गाड्या वातानुकुलीत आहेत. त्या गाड्या बसस्थानकात लागल्यानंतर बंद करुन चालत नाहीत. त्यामुळे अशा गाड्यांना डिझेलचा वापर जास्त होतो. त्यामुळे अनेकदा डिझेलचा खर्च तरी निघेल का नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने इलेक्ट्रीक गाड्या रस्त्यावर आणण्याचा संकल्प केला आहे. यामुळे डिझेलवर होणारा मोठ्या खर्च वाचणार आहे. मात्र, एसटीसमोर सध्या काही अडचणी भासत आहेत. सातारा जिल्हा हा डोंगर उताराचा आहे. यामुळे गाड्यांना घाट चढून जाण्यासाठी जास्त ताकद लागते. यामुळे सातारा जिल्ह्यात हा प्रयोग कितपत यशस्वी होऊ शकतो. हे सांगता येत नाही. कारण बॅटऱ्या मध्येच डिस्चार्ज झाल्या तर काय करायचे ही समस्या आहे. मात्र, घाट रस्ता वगळून या गाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो.

पर्यावरणाचे संवर्धन

कासला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या ठिकाणी उगवणारी फुले अन्य कोठेही पाहायला मिळत नाहीत. अशावेळी निसर्गाकडून सातारकरांना लाभलेल्या अमूल्य देणगीचे जतन, संवर्धन करणे प्रत्येक सातारकराचे कर्तव्य आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कासचा प्रचार व प्रसार झाल्याने जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक दाखल होत आहेत. ही बाब गौरवास्पद आहे. मात्र, त्याचवेळी हजारो गाड्या दररोज पठारावर येतात. धूर ओकणाऱ्या गाड्यांमुळे निसर्गावर घाला येत असतो. हे येथील निसर्गासाठी घातक आहे. अनंत मुंडीवाले विभाग नियंत्रक असताना त्यांनी केवळ कास पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन मिनीबसची सोय केली होती. तेव्हा एसटी महामंडळाने कास, महाबळेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळी इलेक्ट्रीक गाड्या नेऊन ठेवल्या तर तेथेच त्यांचा वापर चांगला करता येऊ शकतो. यामुळे एसटीचे उत्पन्न वाढेल आणि प्रदूषणापासून निसर्गाचे होणारे नुकसानही टाळण्यासाठी मदत होऊ शकते.

कोट :

साताऱ्याला निसर्गानेही भरभरुन निसर्गसंपदा दिली आहे. त्याचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करुन विजेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक गाड्यांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

- प्रा. डॉ. दादासाहेब नवले, सातारा.