शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

मुंबईतील निवडणुकीआधी सरकार अल्पमतात!

By admin | Updated: February 21, 2016 01:00 IST

पृथ्वीराज चव्हाण : साताऱ्यात वर्तविले भाकित; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वकांक्षा

सातारा : ‘मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात आल्याखेरीज राज्यावर पकड मिळणार नाही, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वकांक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी सरकार अल्पमतात जाईल,’ असे भाकित माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केले. आ. चव्हाण म्हणाले, ‘निवडणूक काळात अव्वा-सव्वा आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे सरकार अत्यंत तकलादू स्वरूपाचे आहे. या सरकारमध्ये कुणाचा कुणाला पाय-पोस राहिलेला नाही. मुख्यमंत्रीच अधिकारी व सहकारी मंत्री ऐकत नसल्याचे कबूल करतायत. वेळोवेळी तोंडघशी पडण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. अत्यंत हास्यास्पद पद्धतीने राज्याचे कामकाज सद्यघडीला सुरू आहे. त्यातच भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्याची महत्त्वकांक्षा बाळगून आहेत. यामुळे शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये अल्पावधीत तेढ निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी हे सरकार अल्पमतात जाईल.‘ ‘राज्यात भयंकर दुष्काळ पडला असताना सरकार उपाययोजना करण्याऐवजी महंमद तुघलकी निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. दुष्काळाचे गांभीर्य सरकारला राहिलेले नाही. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी भागात जनावरांच्या छावण्या बंद करण्याची घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनाही या घोषणेबाबत कल्पना नव्हती. राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर खडसेंना यू-टर्न घ्यावा लागला,’ अशी टीकाही आ. चव्हाण यांनी केली. लातूर शहरातही सध्या २५ दिवसांतून एकदा पाणी येते. रेल्वेने पाणी आणून लोकांची तहान भागवू, अशी घोषणा शासनाने केली होती. ती हवेत विरली आहे. शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील ६० ते ७० हजार जागा रिकाम्या राहिल्या आहेत. या महाविद्यालयांतून तयार होणाऱ्या अभियंत्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याने त्यांना कामावर घेतल्यावर सहा महिन्यांचे पुन्हा ट्रेनिंग द्यावे लागते, असा आरोप उद्योजक करत आहेत. केंद्र सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी करत आहे. अफजल गुरुला फाशी दिली तर भाजपचा काश्मीरमधील मित्रपक्ष त्याला हुतात्मा म्हणतो तर मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी देशद्रोहासारखे खोटे खटले दाखल केले जातात, असा दांभिकपणा सरकारकडून सुरू आहे. साताऱ्यातील या पत्रकार परिषदेला काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, सातारा पालिकेचे आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)