शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील निवडणुकीआधी सरकार अल्पमतात!

By admin | Updated: February 21, 2016 01:00 IST

पृथ्वीराज चव्हाण : साताऱ्यात वर्तविले भाकित; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वकांक्षा

सातारा : ‘मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात आल्याखेरीज राज्यावर पकड मिळणार नाही, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वकांक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी सरकार अल्पमतात जाईल,’ असे भाकित माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केले. आ. चव्हाण म्हणाले, ‘निवडणूक काळात अव्वा-सव्वा आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे सरकार अत्यंत तकलादू स्वरूपाचे आहे. या सरकारमध्ये कुणाचा कुणाला पाय-पोस राहिलेला नाही. मुख्यमंत्रीच अधिकारी व सहकारी मंत्री ऐकत नसल्याचे कबूल करतायत. वेळोवेळी तोंडघशी पडण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. अत्यंत हास्यास्पद पद्धतीने राज्याचे कामकाज सद्यघडीला सुरू आहे. त्यातच भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्याची महत्त्वकांक्षा बाळगून आहेत. यामुळे शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये अल्पावधीत तेढ निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी हे सरकार अल्पमतात जाईल.‘ ‘राज्यात भयंकर दुष्काळ पडला असताना सरकार उपाययोजना करण्याऐवजी महंमद तुघलकी निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. दुष्काळाचे गांभीर्य सरकारला राहिलेले नाही. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी भागात जनावरांच्या छावण्या बंद करण्याची घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनाही या घोषणेबाबत कल्पना नव्हती. राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर खडसेंना यू-टर्न घ्यावा लागला,’ अशी टीकाही आ. चव्हाण यांनी केली. लातूर शहरातही सध्या २५ दिवसांतून एकदा पाणी येते. रेल्वेने पाणी आणून लोकांची तहान भागवू, अशी घोषणा शासनाने केली होती. ती हवेत विरली आहे. शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील ६० ते ७० हजार जागा रिकाम्या राहिल्या आहेत. या महाविद्यालयांतून तयार होणाऱ्या अभियंत्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याने त्यांना कामावर घेतल्यावर सहा महिन्यांचे पुन्हा ट्रेनिंग द्यावे लागते, असा आरोप उद्योजक करत आहेत. केंद्र सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी करत आहे. अफजल गुरुला फाशी दिली तर भाजपचा काश्मीरमधील मित्रपक्ष त्याला हुतात्मा म्हणतो तर मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी देशद्रोहासारखे खोटे खटले दाखल केले जातात, असा दांभिकपणा सरकारकडून सुरू आहे. साताऱ्यातील या पत्रकार परिषदेला काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, सातारा पालिकेचे आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)