शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

निवडणुकीची सूत्रे तरुणांच्या हातात...

By admin | Updated: November 2, 2016 00:09 IST

नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच : काँग्रेसचा बालेकिल्ला मोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना; गड राखण्यासाठी हालचाली वाढल्या

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या रणमैदानात मातब्बरांनी दंड थोपाटले असले तरी नगराध्यक्षपदासाठी आरक्षित असलेल्या प्रभागांमधून सर्वसमावेशक उमेदवार देण्यासाठी प्रमुख पक्षांच्या वर्तुळात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता याच निकषाचा विचार सुरू आहे. सत्तेचा गड राखण्याबरोबरच सिंह डरकला पाहिजे. यासाठी नगराध्यक्षपदावर निशाणा साधला जात आहे. मात्र, आजच्या छाननीमध्ये कोणाची दांडी गुल होणार यावर पुढील धोरणे अवलंबून असल्याने सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना यांनी नगराध्यक्षपद राखीव असलेल्या प्रभाग क्र. ३, ८, १२, १६ आणि १७ या पाच प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रभागांमधून एकूण २६ अर्ज दाखल झाले असले तरी तीन पॅनेलमधून केवळ १५ जणच लढत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ प्रभागांमधून पक्षीय पातळीवर लढत होण्याबरोबरच नगराध्यक्षपदाच्या प्रभागावर लक्ष वेधले जाणार आहे. त्यासाठी पक्षांच्या वतीने विशेष रचना केली जात आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हात घालण्यासाठी राष्ट्रवादीने जोमाने तयारी केली असून, प्रत्यक प्रभागवार पक्षनेतृत्वाने प्रचाराची धुरा प्रमुखांवर सोपावली आहे. तर काँग्रेसने आपला मूळचा बांधा मजबूत करण्यावर भर दिला आहे. खंडाळ्याची निवडणूक ही तरुण फळीच्या हातात असल्याने सर्वच पक्षांनी पक्षातील दुसऱ्या पलटणीवर जबाबदारी सोपावली आहे. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गाढवे, किरण खंडागळे, प्रल्हाद खंडागळे, योगेश गाढवे, संतोष बावकर, सचिन खंडागळे, स्वप्निल खंडागळे, युवराज गाढवे, जोतिबा जाधव अशी तरुणांची मजबूत फळी प्रचाराच्या आखाड्यात उतरणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीने अ‍ॅड. शामराव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली शैलेश गाढवे, प्रशांत गाढवे, अशोक गाढवे, दयानंद खंडागळे, केतन देशमुख, सागर गुरव, धैर्यशील नरुटे या तरुण फळीने जोरदार प्रतिउत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपा-शिवसेनेच्या युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतरच प्रचाराची रणनीती ठरणार असल्याने दोन्ही पक्षांमध्ये सध्यातरी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चीच भूमिका आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश येतील त्याचप्रमाणे घडेल असेच बोलले जात आहे. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर सूत जुळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नगरपंचायतीच्या सभागृहात आपली वर्णी लागावी यासाठी पक्षाचे अधिकृत तिकीट आपल्याच पदरात पडावे, यासाठी इच्छुकांनी आपले पदर पक्षप्रमुखांकडे पसरले आहेत. यामुळे मंगळवारी छाननीमध्ये पक्षाच्या तिकिटाचे दान कोणाच्या पदरात पडणार यावरच लढतीचे चित्र अवलंबून आहे. तिकीट कोणाचे याची अंतिम यादी काँग्रेस-राष्ट्रवादीने तयार केल्याची चर्चा असली तरी उमेदवारांना याची खबर अद्याप नसल्याने आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. (प्रतिनिधी)