शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

ग्रामपंचायतीच्या ६५ पराभूतांना निवडणूक बंदी

By admin | Updated: May 7, 2016 00:53 IST

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने आले गंडांतर; पाच वर्षे निवडणूक लढणे अशक्य - लोकमत विशेष

सागर गुजर -- सातारा -ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ३० दिवसांत खर्चाची बिले सादर न करणाऱ्या तब्बल ६५ पराभूत उमेदवारांना पुढील पाच वर्षे अपात्र ठरविण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिला आहे. अपात्र सर्व उमेदवार हे खंडाळा तालुक्यातील आहेत.सातारा जिल्ह्यातील तब्बल ९०२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका गतवर्षी पार पडल्या. आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्या टप्प्यात ७११ तर नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात १७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायत निवडणुकीचा राज्यभरातील हा उच्चांक होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने अत्यंत काटेकोर नियोजन करून निवडणुकांचे हे दोन टप्पे पार पाडले. दरम्यान, ‘ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार १४ ब व ख’ नुसार निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या विजयी तसेच पराभूत अशा सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. या मुदतीत निवडणूक खर्च दिला नाही, तर संबंधित उमेदवारांना ५ वर्षे ग्रामपंचायत निवडणुकीतून अपात्र ठरविण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामपंचायत निवडणुका होणार असल्याने या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांनी खर्चाची माहिती निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत देण्याची सूचना केली होती. याबाबतीत कायद्यातील तरतूदही त्यांनी स्पष्ट केली होती; परंतु अनेक उमेदवारांनी हे गांभीर्याने घेतले नसल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला दिमाखात उभे राहिले; पण मतदारांनी नाकारल्याने पराभूत झालेल्या जिल्ह्यातील ६५ पराभूत उमेदवारांना आता पुढील पाच वर्षे निवडणूकच लढता येणार नाही. राजकीय दबावाला झुगारून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कायद्यापुढे सर्वचजण सारखे असतात, हे या निर्णयातून समोर आले आहे. विजयी झाल्यानंतरच निवडणूक खर्च द्यावा लागतो, हा भ्रम यानिमित्ताने दूर होण्यास मदत होणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सज्ज झालेल्या उमेदवारांनी ‘पुढच्याच ठेच...मागचा शहाणा,’ या उक्तीप्रमाणे बोध घ्यावा, असा संदेश अपात्रतेच्या निर्णयामुळे समाजात पोहोचणार आहे.निवडणुकीसाठी उभे राहून निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांनी काटेकोरपणे आपल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागामार्फत देण्यात आली. आणखी ४३७ उमेदवारांना नोटिसानिवडणुकीचा खर्च सादर न केलेल्या कऱ्हाड व वाई तालुक्यांतील आणखी ४३७ उमेदवारांना नोटिसा धाडल्या आहेत. वाई तालुक्यातील उमेदवारांना याआधीच नोटीसा पाठविल्या गेल्या असून, कऱ्हाड तालुक्यातील उमेदवारांना शुक्रवारी नोटिसा धाडण्यात आल्या. ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करावा, अन्यथा निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे वेळोवेळी सांगण्यात आले होते. तरीही अनेकांनी खर्चाचा तपशील दिला नाही. अशा लोकांवर कायद्याप्रमाणे कारवाई करणे गरजेचे होते, त्यानुसार खर्चाचा तपशील न देणाऱ्यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. - प्रमोद यादव, अप्पर जिल्हाधिकारी