शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या ६५ पराभूतांना निवडणूक बंदी

By admin | Updated: May 7, 2016 00:53 IST

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने आले गंडांतर; पाच वर्षे निवडणूक लढणे अशक्य - लोकमत विशेष

सागर गुजर -- सातारा -ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ३० दिवसांत खर्चाची बिले सादर न करणाऱ्या तब्बल ६५ पराभूत उमेदवारांना पुढील पाच वर्षे अपात्र ठरविण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिला आहे. अपात्र सर्व उमेदवार हे खंडाळा तालुक्यातील आहेत.सातारा जिल्ह्यातील तब्बल ९०२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका गतवर्षी पार पडल्या. आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्या टप्प्यात ७११ तर नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात १७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायत निवडणुकीचा राज्यभरातील हा उच्चांक होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने अत्यंत काटेकोर नियोजन करून निवडणुकांचे हे दोन टप्पे पार पाडले. दरम्यान, ‘ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार १४ ब व ख’ नुसार निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या विजयी तसेच पराभूत अशा सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. या मुदतीत निवडणूक खर्च दिला नाही, तर संबंधित उमेदवारांना ५ वर्षे ग्रामपंचायत निवडणुकीतून अपात्र ठरविण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामपंचायत निवडणुका होणार असल्याने या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांनी खर्चाची माहिती निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत देण्याची सूचना केली होती. याबाबतीत कायद्यातील तरतूदही त्यांनी स्पष्ट केली होती; परंतु अनेक उमेदवारांनी हे गांभीर्याने घेतले नसल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला दिमाखात उभे राहिले; पण मतदारांनी नाकारल्याने पराभूत झालेल्या जिल्ह्यातील ६५ पराभूत उमेदवारांना आता पुढील पाच वर्षे निवडणूकच लढता येणार नाही. राजकीय दबावाला झुगारून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कायद्यापुढे सर्वचजण सारखे असतात, हे या निर्णयातून समोर आले आहे. विजयी झाल्यानंतरच निवडणूक खर्च द्यावा लागतो, हा भ्रम यानिमित्ताने दूर होण्यास मदत होणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सज्ज झालेल्या उमेदवारांनी ‘पुढच्याच ठेच...मागचा शहाणा,’ या उक्तीप्रमाणे बोध घ्यावा, असा संदेश अपात्रतेच्या निर्णयामुळे समाजात पोहोचणार आहे.निवडणुकीसाठी उभे राहून निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांनी काटेकोरपणे आपल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागामार्फत देण्यात आली. आणखी ४३७ उमेदवारांना नोटिसानिवडणुकीचा खर्च सादर न केलेल्या कऱ्हाड व वाई तालुक्यांतील आणखी ४३७ उमेदवारांना नोटिसा धाडल्या आहेत. वाई तालुक्यातील उमेदवारांना याआधीच नोटीसा पाठविल्या गेल्या असून, कऱ्हाड तालुक्यातील उमेदवारांना शुक्रवारी नोटिसा धाडण्यात आल्या. ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करावा, अन्यथा निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे वेळोवेळी सांगण्यात आले होते. तरीही अनेकांनी खर्चाचा तपशील दिला नाही. अशा लोकांवर कायद्याप्रमाणे कारवाई करणे गरजेचे होते, त्यानुसार खर्चाचा तपशील न देणाऱ्यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. - प्रमोद यादव, अप्पर जिल्हाधिकारी