शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूमुळे दगावले आठ महिन्यांत २३ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:36 IST

सातारा : स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गेल्या आठ महिन्यांत तब्बल ८३ जणांना स्वाईन फ्लूची लागण

ठळक मुद्दे ८३ जणांना लागण : जिल्हा रुग्णालयात टॅमी फ्लूचा पाच हजारांचा साठा दर वर्षी ऐन गणेशोत्सवामध्येच स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गेल्या आठ महिन्यांत तब्बल ८३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, २३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले असून, टॅमी फ्लूच्या पाच हजार गोळ्यांचा साठा रुग्णालय प्रशासनाने शिलकीमध्ये ठेवला आहे.

जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर स्वाईन फ्लू संशयितांची संख्या वाढतच गेली. रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी होऊ लागली. त्यामध्ये जवळपास ८३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचार सुरू असताना यातील २३ जणांना आपला जीव गमवावा लागला. दर वर्षी ऐन गणेशोत्सवामध्येच स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने टॅमी फ्लूच्या पाच हजार गोळ्या शिलकीमध्ये ठेवल्याआहेत. प्रत्येक रुग्णाची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या घसा आणि स्त्रावाचे नमुने घेतले जातात. त्यानंतर पुणे येथील प्रयोग शाळेत हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतात. दोन दिवसांमध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्णाला टॅमी फ्लूच्या गोळ्या दिला जातात.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सध्या चार वैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेखीखाली स्वाईन फ्लू रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नागरिकांनी ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात येऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी केले आहे.गंभीर असेल तर नमुने घेणारथंडी, तापाची लक्षणे असल्यास अनेकजण भीतीपोटी स्वाईन फ्लूची तपासणी करत आहेत. मात्र, रुग्णालय प्रशासनाने रुग्ण गंभीर असल्याशिवाय आम्ही स्वाईन फ्लूची तपासणी करणार नाही, असा अलिखीत फतवा काढल्याने रुग्णांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरसकट सर्व रुग्णांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.