शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

घोटाळाप्रकरणी आठ संचालकांना अटक

By admin | Updated: November 27, 2015 00:41 IST

आण्णासाहेब पाटील पतसंस्था : गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सांगली : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आण्णासाहेब पाटील सहकारी पतसंस्थेतील १२ कोटी २६ लाख ७३ हजार २९६ रुपयांच्या अपहारप्रकरणी पतसंस्थेच्या आठ संचालकांना गुरुवारी अटक करण्यात आली.आठही संचालकांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास आल्यानंतर या विभागाच्यावतीने तातडीने आणि जलदगतीने तपास करत याप्रकरणी या आठ संचालकांना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणातील संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब पाटील याला अटक केली होती. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सौ. मालती लक्ष्मण कोळी (वय ४८, रा. सैनिक वसाहत मागे, मिरज), रावसाहेब जयकुमार कवठेकर (५२, रा. आनंदसागर कॉलनी, मिरज), बाबासाहेब मारुती यादव (५८, रा. नवीन बायपास पूल, सांगलीवाडी), शंकर सितारा कोळी, (रा. सांगलीवाडी), सौ. कल्पना सुदाम रेंगडे (४८, रा. गणेशनगर, सांगली), जयंत नामदेव माने (५०, रा. कर्नाळ, सांगली), विशाल विलास पाटील (३५, रा. गोटखिंडी, ता. वाळवा), दयानंद विठ्ठल लोंढे (६०, रा. माजी सैनिक सोसायटी, मिरज) अशी अटक केलेल्या संचालकांची नावे आहेत. हे सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.या पतसंस्थेतील गैरव्यवहाराबाबत तत्कालीन विशेष लेखापरीक्षक वर्ग दोनचे अधिकारी दिलीप जयवंत जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी याचा तपास केला होता. पण त्यानंतर हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर पुन्हा या तपासाला गती देण्यात आली आणि त्यामध्ये अटक असलेल्या संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब पाटील याची चौकशी करण्यात आली. याशिवाय या पतसंस्थेचे पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये बोगस सह्या व धनादेशाद्वारे पैसे बुडीत असलेल्या बल्लाळेश्वर पतसंस्थेत ठेवण्यात आल्याचे दाखविले. आठ जणांवर अटकेची कारवाई झाली आहे. अजून उर्वरित संचालकांनाही लवकरच अटक करण्यात येईल. (प्रतिनिधी)तत्कालीन संचालक जबाबदारजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही पतसंस्था निर्माण करण्यात आली होती. पण या पतसंस्थेत संस्थापक-संचालक आण्णासाहेब मलगोंडा पाटील याने मोठा घोटाळा केला. या घोटाळ्याला तत्कालीन संचालक मंडळालाही जबाबदार धरण्यात आले होते.