शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आठ जनावरे आगीत होरपळली

By admin | Updated: January 26, 2016 00:51 IST

येणपेतील घटना : आग विझविताना एकजण जखमी

उंडाळे : कऱ्हाड तालुक्यातील येणपे-चोरमारवाडी येथे जनावरांच्या शेडला आग लागल्यामुळे ८ जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. आगीत सुमारे २ लाखांचे नुकसान झाले असून, आग विझवताना शेडचे मालक विष्णू चोरमारे हेसुद्धा जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चोरमारवाडी-येणपे येथील विष्णू अण्णा चोरमारे व यशवंत आबा चोरमारे यांचे राहत्या घराशेजारी जनावरांचे शेड आहे . या शेडमध्ये सहा म्हशी, एक गाय व खिलार वासरू बांधले होते. दोन्ही कुंटुबातील लोक जेवण करून झोपले होते. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या शेडला अचानक आग लागल्याने जनावरांनी जोरदार हंबरडा फोडला. दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जनावरांचा चारा व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत आठ जनावरे ७० टक्यांहून अधिक भाजली. यावेळी आग शमविण्यासाठी गेलेले विष्णू चोरमारे यांचा चेहरा भाजला असून, त्यांच्यावर उंडाळे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर गावकामगार तलाठी जी.एच. धराडे व रमेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जळिताचा पंचनामा केला. या आगीत सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे . (वार्ताहर) सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत येळगाव व परिसरातील परगावी असणारे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत . परगावी असणाऱ्यांना आपला गावात, परिसरात काय घटना घडली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून समजते. चोरमारवाडी येथील घटना घडल्यानंतर रमेश शेटे यांच्यासह ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या ग्रुपवरील शंभर जणांकडून प्रत्येकी शंभर रुपये काढून जमा झालेली दहा हजारांची रक्कम जळीतग्रस्तांना मदत म्हणून दिली.