शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपायोजना कराव्यात : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST

सातारा : वणवे रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे हे ...

सातारा : वणवे रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

सातारा येथील वनविभाग कार्यालय वनविभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सहा.वनसंरक्षक व्ही.जे. गोसावी, सहा.वनसंरक्षक एस.बी. चव्हाण, सहा.वनसंरक्षक के.एस. कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. ढोंबाळे आदी उपस्थित होते.

उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जंगलामध्ये नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे निर्मिती करून मानवी वस्तीत पाण्याच्या शोधासाठी वन्य जीवांना येण्यापासून रोखणे शक्य होईल, असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वनविभागास प्राप्त होणारा निधी व सेवा सुविधांसाठी होणारा संभाव्य खर्च आणि वनविभागाच्या इतर विषयांचा सविस्तर आढावा बैठकीत घेतला.