शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

पावसाच्या विषमतेचा परिणाम; जिल्ह्यात हंगामात ९३ टक्केच पेरणी पूर्ण

By नितीन काळेल | Updated: August 14, 2023 19:27 IST

खरीपाचे १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..

सातारा : जिल्ह्यात पावसाची विषमता राहिल्याने यावर्षी खरीप हंगामात ९३ टक्क्यांवरच पेरणी पूर्ण झाली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर यंदाही सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झालेली आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर होते. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आलेले. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार १९०, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आता खरीपची पेरणी संपली आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार २ लाख ६९ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाणत ९३.३८ इतके आहे. यामध्ये भाताची लागण ४३ हजार १८१ हेक्टरवर झालेली आहे. याचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ७ हजार ६७१ हेक्टरवर तर मकेची १६ हजार ८६१ हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ८५ हजार ७९२ हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण ११५ आहे. तर भुईमुगाची २७ हजार ३३२ हेक्टर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.

यावर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. पण, हा पाऊस पश्चिमेलाच चांगला झाला. तर पूर्व माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातही आजही पावसाची प्रतीक्षा आहे. पण, पाऊस पडेल आशेवर दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण, पेरणी क्षेत्र कमी राहिले. सध्या पावसाअभावी ही पिके वाळू लागलीत. तर पश्चिम भागात पाऊस झाल्याने पेरण्या उरकल्या. त्यामुळे ही पिके चांगलीही आली आहेत. पण, यावर्षी पावसाची विषमता राहिल्याने खरीप हंगामातील पेरणी १०० टक्के झालीच नाही. त्यामुळे १९ हजार हेक्टरवर क्षेत्रावरील पेरणी राहिल्याचा अंदाज आहे.