शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

खाद्यतेलाचा दर स्थिर; वाटाणा अजूनही महागच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

सातारा : मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर वाढला होता. पण, तीन आठवड्यांपासून त्यात उतार आला आहे. गेल्या दोन आठवड्यांत ...

सातारा : मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर वाढला होता. पण, तीन आठवड्यांपासून त्यात उतार आला आहे. गेल्या दोन आठवड्यांत तर दर जैसे थे राहिले आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो कवडीमोलच आहे. वांग्याचा भाव कमी झाला. कांद्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४१० क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. रविवारी कांद्याची आवक झाली नसली तरी क्विंटलला ५००पासून २ हजारांपर्यंत दर मिळत आहे. तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ३० ते ५० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला १,२००पर्यंत तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाला. त्याचबरोबर वाटाण्याला ९ ते १० हजारांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत भुईमूग शेंगाचीही आवक होत आहे.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २,३०० ते २,४०० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर पामतेलचा डबा १,८५०, शेंगदाणा तेल डबा २,२५० ते २,४०० आणि सोयाबीनचा डबा २,१०० ते २,२५० रुपयांपर्यंत मिळत आहे. सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १५० रुपये, सूर्यफूलचा पाऊच १७० रुपयांना मिळत आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत आंब्याची आवक कमी झालेली आहे. सध्या डाळिंब आणि पपईची आवक चांगली होत आहे. मात्र, दर कमी मिळत आहे.

बटाटा दर...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १,४०० ते १,६०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला २५० ते ३५०, ढबू २५० ते ३००, शेवगा शेंग २५० ते ३००, गवारला १५० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला.

प्रतिक्रिया

मागील एक महिन्यापासून खाद्यतेल दरात उतार आला आहे. डब्याबरोबरच पाऊचचेही दर उतरले आहेत. यामुळे अनेक महिन्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

- संभाजी आगुंडे,

विक्री प्रतिनिधी

तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे कोणतीही भाजी ही ४० रुपयांवर किलो मिळत आहे. सध्या वाटाणा तेवढा १२० रुपये किलोच्या पुढे मिळत आहे. कांदाही स्थिर आहे.

- पांडुरंग काळे,

ग्राहक

मागील दोन महिन्यांपासून कांद्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर वाटाण्यालाही चांगला भाव आहे. पण, टोमॅटो अन् कोबीचा भाव पडलेलाच आहे. त्यामुळे या दोन भाजीपाल्यातून तोटा होत आहे. खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. - राजाराम पाटील, शेतकरी

................................................................................................................................................................................................................