शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा दर स्थिर; वाटाणा अजूनही महागच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

सातारा : मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर वाढला होता. पण, तीन आठवड्यांपासून त्यात उतार आला आहे. गेल्या दोन आठवड्यांत ...

सातारा : मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर वाढला होता. पण, तीन आठवड्यांपासून त्यात उतार आला आहे. गेल्या दोन आठवड्यांत तर दर जैसे थे राहिले आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो कवडीमोलच आहे. वांग्याचा भाव कमी झाला. कांद्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४१० क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. रविवारी कांद्याची आवक झाली नसली तरी क्विंटलला ५००पासून २ हजारांपर्यंत दर मिळत आहे. तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ३० ते ५० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला १,२००पर्यंत तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाला. त्याचबरोबर वाटाण्याला ९ ते १० हजारांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत भुईमूग शेंगाचीही आवक होत आहे.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २,३०० ते २,४०० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर पामतेलचा डबा १,८५०, शेंगदाणा तेल डबा २,२५० ते २,४०० आणि सोयाबीनचा डबा २,१०० ते २,२५० रुपयांपर्यंत मिळत आहे. सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १५० रुपये, सूर्यफूलचा पाऊच १७० रुपयांना मिळत आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत आंब्याची आवक कमी झालेली आहे. सध्या डाळिंब आणि पपईची आवक चांगली होत आहे. मात्र, दर कमी मिळत आहे.

बटाटा दर...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १,४०० ते १,६०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला २५० ते ३५०, ढबू २५० ते ३००, शेवगा शेंग २५० ते ३००, गवारला १५० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला.

प्रतिक्रिया

मागील एक महिन्यापासून खाद्यतेल दरात उतार आला आहे. डब्याबरोबरच पाऊचचेही दर उतरले आहेत. यामुळे अनेक महिन्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

- संभाजी आगुंडे,

विक्री प्रतिनिधी

तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे कोणतीही भाजी ही ४० रुपयांवर किलो मिळत आहे. सध्या वाटाणा तेवढा १२० रुपये किलोच्या पुढे मिळत आहे. कांदाही स्थिर आहे.

- पांडुरंग काळे,

ग्राहक

मागील दोन महिन्यांपासून कांद्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर वाटाण्यालाही चांगला भाव आहे. पण, टोमॅटो अन् कोबीचा भाव पडलेलाच आहे. त्यामुळे या दोन भाजीपाल्यातून तोटा होत आहे. खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. - राजाराम पाटील, शेतकरी

................................................................................................................................................................................................................