शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांनंतर खाद्यतेलाचा दर स्थिर; मागणी झाली कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST

सातारा : मागील चार महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर सतत वाढत होता. मात्र, सध्या मागणी कमी झाल्याने प्रथमच मागील आठवड्यात दर ...

सातारा : मागील चार महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर सतत वाढत होता. मात्र, सध्या मागणी कमी झाल्याने प्रथमच मागील आठवड्यात दर स्थिर राहिला. तर साताऱ्यात कांद्याचा दर उतरत असून बाजार समितीत तर अनेक दिवसांनंतर वाटाण्याला चांगला भाव मिळत आहे. रविवारी क्विंटलला सहा हजारांपर्यंत दर मिळाला.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते.

सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ३७१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची ३९० क्विंटलची आवक झाली. या रविवारी कांद्याची आवक चांगली झाली. बाजार समितीत वांग्याला १० किलोला अवघा १०० ते १३० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ८० ते १००रुपये, कोबी ४० ते ५० रुपये, फ्लाॅवरला ६० ते १०० रुपये, दोडक्याला ३०० ते ३५० रुपये भाव आला.

तेल डब्याला मागणी कमी

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मात्र, मागील आठवड्यात दर स्थिर राहिले आहेत. बाजारातही तेलाला मागणी कमी आहे. विशेष म्हणजे १५ किलोचा डबा घेण्याऐवजी बहुतांशी ग्राहक हे एक लिटरचा पाऊच घेतात. सूर्यफूल तेलाचा पाऊच १६० ते १७० तर शेंगदाणा तेलाचा १७० ते १७५ रुपयांना मिळत आहे.

द्राक्षाची आवक

साताऱ्यात सध्या कलिंगड आणि द्राक्षाची आवक अधिक आहे. त्यामुळे दरात फार वाढ नाही. कलिंगड १० रुपयांपासून तर द्राक्षे ४० रुपयांपासून किलोने मिळत आहेत.

लसणाला दर

बाजार समितीत भाज्यांना कमी दर आहे. गवारला १० किलोला ३०० ते ४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवगा शेंगेला अवघा १५० ते २००, पावटा ४०० ते ४५० आणि भेंडीला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. लसणाला ६ हजार तर बटाट्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत दर निघाला.

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होत चालले आहेत. यामुळे दिलासा असलातरी खाद्यतेलाचे दर अजूल वाढलेलेच आहेत. यामुळे खर्चातही वाढ झालेलीच आहे.

- आशा पवार, ग्राहक

कोरोनामुळे पाश्चात्य देशांची अर्थव्यवस्था खालावली. त्यामुळे त्या देशांनी निर्यात कर वाढवला आहे. परिणामी खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. मागील आठवड्यात दर स्थिर होता.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कांद्याचा दर एकदमच खाली आला आहे. त्यामुळे खर्चतरी निघेल का नाही, अशी स्थिती आहे. त्यातच इतर भाज्यांचेही दर कमी झाले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

- रामचंद्र पाटील , शेतकरी

..................................................................................................................................................................................................................................