शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

टोमॅटोवर लालकोळीचे ग्रहण

By admin | Updated: August 3, 2015 21:43 IST

मेहनत पाण्यात : आदर्की परिसरात १५ लाख रोपांची लागवड; लाखोंचे नुकसान

फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात धोम-बलकवडीचे पाणी आल्यामुळे शेतकरी समाधानी होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४ ते १५ लाख टोमॅटो रोपांची लागणही केली. गेल्या महिन्यापासून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी आली; परंतु, गेल्या आठवड्यात ‘लालकोळी’ नावाच्या रोगाचा बागांवर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे लाखो रुपये पाण्यात जाणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.फलटण तालुक्यातील काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक येथे टोमॅटोच्या चार-पाच हजार रोपांची लागण होत होती. मात्र, टोमॅटो उत्पादन व दर चांगला मिळू लागल्यामुळे शेतकरी इतर पिकांकडून टोमॅटो उत्पादनाकडे वळाला आहे. टोमॅटो पिकासाठी भांडवल एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये गुंतवावे लागते. यामध्ये टोमॅटोची रोपे, तारा, सुतळी, काट्या ही साधने व मजुरी यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. परिसरातील सालपे, आनंदगाव, हिंगणगाव, सासवड, आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, कापशी, वाघोशी, कोल्हाळे. वडगाव परिसरात धोम-बलकवडीचे पाणी उजव्या कालव्याचे पाणी ओढ्याद्वारे सोडले. त्याचा परिणाम विहिरींवर होऊन पाणी पातळी वाढली आहे. त्याचा परिणाम विहिरींवर होऊन बागायती क्षेत्र वाढले. त्यामुळे पैसे देणारे पीक म्हणून आदर्की परिसरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४ ते १५ लाख रोपांची लागण होऊन त्यात शेतकऱ्यांनी चौदा ते पंधरा लाख रोपांची लागण करून एकप्रकारे जुगार खेळली आहे. परंतु, टोमॅटोचे दरच वाढलेले नाहीत. त्यातच गेल्या आठवड्यात सर्व बागांवर लालकोळी नावाच्या रोगाने हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. आदर्कीच्या माळावर लाल चिखलटोमॅटो तोडणीस सुरुवात झाल्यानंतर पानांवर पिवळे टिपके पडतात. त्यानंतर दोन दिवसांत पूर्ण पाने करपून जातात. पुढच्या तीन-चार दिवसांत टोमॅटोची फळ अती पिकतात. बिलबिली झाल्यामुळे ती विक्रीस नेता येत नाही. कोणतेही औषध फवारणी केली तरी फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बाग घालविण्याशिवाय बळीराजाकडे पर्याय उरत नाही. परिसरातील शेतकरी खराब झालेले टोमॅटो बांधावर टाकून देत आहेत. हा रोग न पडला तर बाग आणखी तीन महिने उत्पादन मिळू शकले असते.