शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तासगावच्या विकासाला रखडलेल्या योजनांचे ग्रहण

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

कारभाऱ्यांची उदासीनता कारणीभूत : कोट्यवधीचा खर्च होऊनही कामे अपूर्ण, ठेकेदारांना मात्र अभयदान

दत्ता पाटील - तासगाव -तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तत्कालीन गृृहमंत्र्यांनी अनेक योजनांना मंजुरी मिळवून दिली; मात्र शहर सांभाळणाऱ्या कारभाऱ्यांना या योजना मार्गी लावण्यात अपयश आले. शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या पाणी योजनेचे काम पाच वर्षांपासून रखडलेले आहे. मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचे कामही अद्याप अर्धवट आहे. या योजनांना मुदतवाढ देऊनही पूर्ण झालेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही विकासाचा खेळखंडोबाच झाल्याचे तासगाव शहराचे चित्र आहे.तासगाव शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून २०४० पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून तासगाव नगरपालिकेकडून विस्तारित पाणी योजनेचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला. २१ कोटी ५० लाख रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली. जीवन प्राधिकरणमार्फत या योजनेचे काम सुरू करण्यात आले. २०१० मध्ये तीन टप्प्यात कामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पुणदी रोडचे काम प्रस्तावित होते. या ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र वितरण व्यवस्थेचे काम अर्धवटच राहिले आहे. दुसऱ्या टप्प्यात दत्तमाळ परिसराचे काम होते. येथे वितरण व्यवस्थेचे काम झाले; मात्र टाकीचे काम अपूर्ण राहिले आहे. तिसऱ्या टप्प्यात लांडघोल मळा परिसरातील काम होते. या ठिकाणी तर केवळ खांब उभारण्यात आले. टाकी आणि वितरण व्यवस्थेच्या कामाचा अद्याप पत्ताच नाही. जलशुध्दीकरण यंत्रणेचे कामही अर्धवट करण्यात आले आहे. तीन टप्प्यातील कामे टप्प्या-टप्प्याने करण्याऐवजी ठेकेदाराकडून एकाचवेळी सर्व कामांची सुरुवात करण्यात आली. तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत असतानादेखील काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतही संपली. २१ कोटी ५० लाखांपैकी १८ कोटी खर्ची पडले. तरीही काम रखडलेलेच आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी काही नगरसेवकांनी ठेकेदाराला कोंडून घालून झाडाझडतीही केली होती; मात्र अद्यापही काम जैसे थे आहे. हे काम मार्गी लागावे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांकडून सातत्यपूर्ण पाठपुरावा झाल्याचे दिसून आले नाही. किंंबहुना अधिकारी आणि पदाधिकारी ठेकेदारापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे.शहराच्या विकासात मोलाची भर टाकणारी दुसरी योजना व्यापारी संकुलाची आहे. मध्यवर्ती बसस्थानकालगतच महत्त्वाकांक्षी व्यापारी संकुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी ३ कोटी ७० लाखांची तरतूद करण्यात आली. २०११ मध्ये कामाला सुरुवात झाली. तीन वर्षांची कामाची मुदत संपली. कासवगतीने काम सुरू असल्यामुळे पुन्हा दोन वर्षांची वाढीव मुदत संबंधित ठेकेदाराला देण्यात आली. तरीही अद्याप हे काम पूर्णत्वास आलेले नाही. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि नगरपालिकेतील कारभाऱ्यांच्या गाफीलपणामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी योजनांसाठी खर्च होऊनही कामांची वाताहत झाल्याचे चित्र आहे. तासगाव शहराचा शांघाय करण्याची आश्वासने देत येथील नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या गेल्या. आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ताकद वापरून मंत्रालयीन पातळीवरून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. येथील सत्ताधाऱ्यांकडून वरवरचा विकास झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला. प्रत्यक्षात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे संगनमत, विकासाची उदासीनता, राजकीय लपंडाव यामुळे शहराच्या विकासाचा खेळखंडोबाच झाला. त्याचा वेध घेणारी मालिका आजपासून...विस्तािरत पाणी योजना २१ कोटी ५० लाखव्यापारी संकुल ३ कोटी ७० लाखएकूण २५ कोटी २० लाखतत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंत्रालयात वजन वापरून योजना मंजूर करून आणल्या खऱ्या; मात्र इथल्या कारभाऱ्यांच्या आत्मसंकुचित वृत्तीमुळे त्या अद्यापही पूर्णत्वास आलेल्या नाहीत. त्या केव्हा पूर्ण होतील, याचे उत्तर अद्याप तरी तासगावकरांना मिळालेले नाही.निधी नगरपालिकेचा आणि काम जीवन प्राधिकरणचे अशी अवस्था असल्यामुळे पाणी योजनेचे काम रखडलेले आहे. कामाबाबत ठेकेदाराकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण होईल. तसेच व्यापारी संकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दोन महिन्याची मुदत दिली आहे. त्यानुसार काम पूर्ण न झाल्यास ठेकेदाराचे काळ्या यादीत नाव टाकण्यात येणार आहे. - संजय पवार, नगराध्यक्ष, तासगाव