सातारा : केंद्रीय गृहनिर्माण कायदा १ मे पासून लागू झाला असून, कायद्यातील कलम १७ गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महत्त्वाचे व दिलासा देणारे आहे. या कलमानुसार कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीस भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यापासून तीन महिन्यांत त्या सोसायटीचे अभिहस्तांतरण करणे विकासकामावर बंधनकारक करण्यात आल्याची माहिती जिल्हा गृहनिर्माण संस्थेचे सचिव रंगराव जाधव यांनी दिली. जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सदनिकाधारक गृहनिर्माण संस्थेची इमारत उभी राहिली आहे. तिची मालकी कोणाकडे आहे, याची माहिती ज्या सदनिकाधारक इमारतीत सभासद राहतात त्यांनी घेतली पाहिजे. बऱ्याचवेळा बिल्डर असे क्षेत्र विकसित करण्यासाठी कुलमुखत्यार घेऊन जमीन मालकाकडून घेऊन इमारत उभी करून तेथील सदनिकांची विक्री करतात; परंतु ही इमारत ज्या जमीन मालकांची असते किंबहुना इमारतीचे आयुष्य संपल्यानंतर इमारतीचे बांधकाम करताना जमीन मालक त्यांच्या जमिनीचा हक्क सांगून आर्थिक फायद्याच्या लोभाने अडचण निर्माण करू शकतो. यामुळे पूर्वीचा विकासक यांना बंधनकारक नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत दहापेक्षा जास्त सभासद असलेल्या सभासदांनी इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्याची खात्री करून नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करून अशा संस्थेच्या नावावर इमारत उभी राहिली आहे. ही जमीन नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावावर करून घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) शासनाने प्रक्रिया केली सोपीशासनाने खास मोहिमेद्वारे हे मानीव हस्तांतरण सोपे व्हावे म्हणून अलीकडे नव्या सूचना काढल्या आहेत. पूर्वीच्या किचकट प्रक्रियेत सुधारणा करून संस्थांना मानीव हस्तांतरण करून घेणेची सुविधा सोपी केली आहे. ज्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत जमीन ग्राहक व विकासक यांचेकडून जमीन व त्यावरील इमारत यांचे विहीत मुदतीत संस्थेस हस्तांतरण करून घेणेसाठी अशा इमारतीमधील सभासदांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.
गृहनिर्माण जमिनीचे हस्तांतरण झाले सोपे
By admin | Updated: June 23, 2016 01:43 IST