शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आखाडीच्या नावाखाली मतदारांना जेवणावळी

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

हॉटेल, ढाबे फूल : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचा ‘सोशल प्रचार’

कोपर्डे हवेली : आषाढ महिना म्हणजे मांसाहारी जेवणाचा बेत. वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावाखाली बकरी, कोंबड्यांचा बळी दिले जातात. सध्या ग्रामपंचायत निवडणुकाही आषाढ महिन्यात होत असल्याने आखाडीच्या नावाखाली जेवणावळी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची ‘हायटेक’ तयारी सुरू आहे.निवडणुका म्हटलं की, जेवणावळी आल्याच. कोणतीही निवडणूक असली तरी जेवणावळी झाल्या तरच उमेदवार व मतदारांना निवडणूक झाल्यासारखे वाटते. पूर्वीच्या तुलनेत निवडणुकीच्या प्रचारपद्धतीत सध्या मोठे बदल झाले आहेत. निवडून येण्यासाठी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, संपर्क तसेच साम, दाम, दंड यासारख्या गोष्टी उमेदवाराला अवगद असाव्या लागतात. तरच निवडणूक लढविणे सोपे जाते. गावपातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणुका विकासापेक्षा भावकीच्या मतदानावर जास्त अवलंबून असतात. कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या भावकीचे मतदान आहे. यावर पॅनेलप्रमुख उमेदवाराची निश्चिती करतात. सध्या तालुक्यामध्ये ९३ ग्रामपंचायतींचे मतदान ४ आॅगस्ट रोजी होत असल्याने सर्वत्र निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रचारावर भर देण्यात येत आहे. मात्र, यावेळी उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. जेवणावळीसाठी हॉटेल, ढाबे तसेच ठिकठिकाणी शिवारात जेवणावळी सुरू करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून, मतदारांच्या समस्या ते नव्याने जाणून घेत आहेत. विकासाच्या प्रचारासाठी व स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. भविष्यातील वाद टाळण्यासाठी दोनपेक्षा अधिक पॅनेल असणाऱ्या काही गावांत उमेदवारांच्या प्रचारात बॅनरचा वापर टाळण्याच्या सूचना प्रचारप्रमुखांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. संवेदनशील गावांमध्ये शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती घेतली जात आहे. निवडणुकीचा कालावधी कमी असल्याने आठ दिवसांपासूनच उमेदवारांनी परगावी असणाऱ्या मतदारांच्याबरोबर देखील संपर्क ठेवला आहे. ‘ज्याचे सैन्य त्याची लढाई’ या उक्तीप्रमाणे जिंकण्यासाठी उमेदवार तरुणांना एकत्रित करून प्रचाराचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर)रडत राव घोड्यावर !ग्रामपंचायत उमेदवारांमध्ये आरक्षित जागेवरील उमेदवार देताना पॅनेलप्रमुखाची भांबेरी उडाली. शेवटी नको-नको म्हणत असताना ‘रडत राव घोड्यावर’ म्हणत काहीना उमेदवारी देण्यात आली. तेच तेच उमेदवार पुन्हा-पुन्हा निवडून येत असल्याने पाहिजे तसा विकास होत नाही. त्यामुळे विकासाची जाणीव असणाऱ्या नव्या उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे.- दीपक जाधव, मतदार, खराडे