शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

अवकाळीचा फलटणला फटका

By admin | Updated: November 22, 2014 00:19 IST

द्राक्षबागांचे पन्नास टक्के नुकसान : कोरडवाहू क्षेत्राला मात्र दिलासा

फलटण : ‘काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी तालुक्यातील फळाबागांना त्याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. ३८.३७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षाबगांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे,’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे यांनी दिली. तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बरड कृषी मंडलातील कुरवली बुद्रुक, राजुरी, गोखळी, निरगुडी आदी भागातील द्राक्षाबागांची पाहणी केल्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार कृषी सहायक, कृषी मंडलाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील द्राक्ष, केळी, डाळिंब आदी फळाबागा आणि भाजीपाला पिकांची पाहणी करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला आहे. दरम्यान, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कुरवली खुर्द येथील सचिन सांगळे व सुरेश सांगळे यांच्या तसेच निरगुडी येथील जयपाल सस्ते, प्रदीप सस्ते, सर्जेराव सस्ते, दत्तात्रय सस्ते, गणपतराव सस्ते आदी शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत मंडल कृषी अधिकारी तानाजी चोपडे, निरगुडी कृषी सहायक प्रवीण बनकर व शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील विडणी व बरड कृषी मंडलातील ११ गावांतील ८० शेतकऱ्यांच्या ३८.३७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागांचे पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून होत आहे. हंगामाच्या प्रारंभी सर्वप्रथम द्राक्ष पीक बाजारात विक्रीस गेल्यास अधिक दर मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकरी द्राक्षांची छाटणी अगोदर करून बार लवकर धरतात. त्याप्रमाणे अनेकांनी बार धरल्याने द्राक्षे तयार होऊन या सप्ताहात बाजारात विक्रीस येणार होती. मात्र, अवकाळी पावसाने तयार झालेल्या या द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात ६५ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. तथापि, त्यापैकी अनेकांनी छाटणी करून बार न धरल्याने त्या बागा अवकाळी पावसाच्या नुकसानीपासून बचावल्या आहेत. (प्रतिनिधी)...८० शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसानफलटण तालुक्यातील ८० शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार विडणी मंडलातील धुळदेवमध्ये एका शेतकऱ्याचे 0.८० हेक्टर, सासकल पाच शेतकरी २.५३ हेक्टर, गिरवी आठ शेतकरी ३.८७ हेक्टर, विंचुर्णी एक शेतकरी 0.४० हेक्टर, निरगुडी ४३ शेतकरी १५.२७ हेक्टर. बरड मंडलातील कुरवली सहा शेतकरी ८.२० हेक्टर, पिंंप्रद तीन शेतकरी १.१० हेक्टर, वडले चार शेतकरी १.४० हेक्टर, खटकेवस्ती सात शेतकरी ३.८० हेक्टर, हणमंतवाडी एक शेतकरी 0.४० हेक्टर, राजुरी एक शेतकरी 0.६० हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.