शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

‘जलयुक्त’च्या कामांचा जिल्ह्यात डंका

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

३५ कोटींची तरतूद : चांगला पाऊस झाल्यास ९५ टक्के टंचाईमुक्तीचा विश्वास

सातारा : जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवारच्या कामांचा धडाका सुरू आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजनमधून ३५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास पूर्ण झालेल्या कामांच्या आधारावर संपूर्ण जिल्हा ९५ टक्के टंचाईमुक्त होऊ शकतो, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. अभियान अधिक व्यापक व सक्रिय करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ३५ कोटी ८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील २१५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यातील ५५ कामे लोकसहभागातून सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांतच १९३ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या ५६ कामे प्रगतिपथावर आहेत. १८० पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ३७ पाझर तलावांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ६४ लाखांचा निधी लोकसहभागातून उपलब्ध झाला आहे. अनेक गावांतील लोक या अभियानासाठी काम करत आहेत. विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. याअंतर्गत १६ हजार विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत १ हजार ५५ विहिरींच्या कामाचे उद्दिष्ट आहे.’‘यावर्षी हाती घेतलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे चांगला पाऊस झाला तर जिल्हा ९५ टक्के टंचाईमुक्त होईल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. हिवरे, नलवडेवाडी तसेच जखिणवाडी या गावांनी जलसंधारणात क्रांती केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)