शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पठारावरील गवताची कुरणं बनतायत वणव्याचे भक्ष्य!

By admin | Updated: January 18, 2016 00:41 IST

विघ्नसंतुष्ट लावतायत आग : यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट; वनसंपदा धोक्यात

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यावर येथील पशुधन पोसतं. एवढंच काय पण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांचीही भूकही भागते. अशा या परिसराला आता मात्र विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून वनवे लावून गवताच्या कुरणाची राख करण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसत आहे. विघ्नसंतोषी मंडळींच्या मतीचा कलंक झडला तरच पठारावर गवताचे कोंब फुटतील, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यवतेश्वर, कास, बामणोली या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने उदरनिर्वाहासाठी शेतकरी वर्ग गुरे सांभाळताना दिसतात. गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील जनावरांनाही पोसणारा हा चारा नष्ट होत असल्यामुळे पठारावरील गावांतील जनावरांवरही अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. या प्रवृत्तींना वेळीच रोखले नाहीत तर भविष्यात कास पठारावरील जनावरे जगविण्यासाठी इतरांकडे चाऱ्यासाठी मदत मागण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, विविध प्रकारची वनसंपदा व प्राणीसंपदेने नटलेल्या या परिसरात वणवे लावल्यामुळे कित्येक वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळू लागले आहेत. पशुपक्ष्यांचे निवारे नष्ट होत आहेत. (वार्ताहर) कास पठारावर चरणाऱ्या जनावरांचे शेण, वन्यप्राण्यांची विष्ठा, मूत्र यापासून नैसिर्गिकरीत्या खताची निर्मिती होते. पठारावर वाढणाऱ्या वैविध्यपूर्ण वनस्पतींच्या वाढीसाठी हे खत पोषक ठरते. त्यामुळे परिसरात चरणाऱ्या जनावरांचा, तृणहारी वन्यप्राण्यांचा चारा वणव्यामुळे नष्ट होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान २०११-१२ या सालात पडलेल्या दुष्काळामुळे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून शेकडो टन ओला चारा या भागातून दुष्काळी भागात पाठविण्यात आला होता. यामुळे असंख्य गुरांना जीवनदान मिळाले होते. कास परिसराने केवळ फुलांचाच वारसा जपला नाही, तर या परिसरातील असंख्य गावांनी माणुसकीचाही वारसा जपल्याचं या निमित्तांनं अधोरेखित झालं आहे.