शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पठारावरील गवताची कुरणं बनतायत वणव्याचे भक्ष्य!

By admin | Updated: January 18, 2016 00:41 IST

विघ्नसंतुष्ट लावतायत आग : यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट; वनसंपदा धोक्यात

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यावर येथील पशुधन पोसतं. एवढंच काय पण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांचीही भूकही भागते. अशा या परिसराला आता मात्र विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून वनवे लावून गवताच्या कुरणाची राख करण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसत आहे. विघ्नसंतोषी मंडळींच्या मतीचा कलंक झडला तरच पठारावर गवताचे कोंब फुटतील, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यवतेश्वर, कास, बामणोली या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने उदरनिर्वाहासाठी शेतकरी वर्ग गुरे सांभाळताना दिसतात. गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील जनावरांनाही पोसणारा हा चारा नष्ट होत असल्यामुळे पठारावरील गावांतील जनावरांवरही अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. या प्रवृत्तींना वेळीच रोखले नाहीत तर भविष्यात कास पठारावरील जनावरे जगविण्यासाठी इतरांकडे चाऱ्यासाठी मदत मागण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, विविध प्रकारची वनसंपदा व प्राणीसंपदेने नटलेल्या या परिसरात वणवे लावल्यामुळे कित्येक वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळू लागले आहेत. पशुपक्ष्यांचे निवारे नष्ट होत आहेत. (वार्ताहर) कास पठारावर चरणाऱ्या जनावरांचे शेण, वन्यप्राण्यांची विष्ठा, मूत्र यापासून नैसिर्गिकरीत्या खताची निर्मिती होते. पठारावर वाढणाऱ्या वैविध्यपूर्ण वनस्पतींच्या वाढीसाठी हे खत पोषक ठरते. त्यामुळे परिसरात चरणाऱ्या जनावरांचा, तृणहारी वन्यप्राण्यांचा चारा वणव्यामुळे नष्ट होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान २०११-१२ या सालात पडलेल्या दुष्काळामुळे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून शेकडो टन ओला चारा या भागातून दुष्काळी भागात पाठविण्यात आला होता. यामुळे असंख्य गुरांना जीवनदान मिळाले होते. कास परिसराने केवळ फुलांचाच वारसा जपला नाही, तर या परिसरातील असंख्य गावांनी माणुसकीचाही वारसा जपल्याचं या निमित्तांनं अधोरेखित झालं आहे.