शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

पठारावरील गवताची कुरणं बनतायत वणव्याचे भक्ष्य!

By admin | Updated: January 18, 2016 00:41 IST

विघ्नसंतुष्ट लावतायत आग : यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट; वनसंपदा धोक्यात

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यावर येथील पशुधन पोसतं. एवढंच काय पण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांचीही भूकही भागते. अशा या परिसराला आता मात्र विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून वनवे लावून गवताच्या कुरणाची राख करण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसत आहे. विघ्नसंतोषी मंडळींच्या मतीचा कलंक झडला तरच पठारावर गवताचे कोंब फुटतील, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यवतेश्वर, कास, बामणोली या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने उदरनिर्वाहासाठी शेतकरी वर्ग गुरे सांभाळताना दिसतात. गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील जनावरांनाही पोसणारा हा चारा नष्ट होत असल्यामुळे पठारावरील गावांतील जनावरांवरही अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. या प्रवृत्तींना वेळीच रोखले नाहीत तर भविष्यात कास पठारावरील जनावरे जगविण्यासाठी इतरांकडे चाऱ्यासाठी मदत मागण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, विविध प्रकारची वनसंपदा व प्राणीसंपदेने नटलेल्या या परिसरात वणवे लावल्यामुळे कित्येक वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळू लागले आहेत. पशुपक्ष्यांचे निवारे नष्ट होत आहेत. (वार्ताहर) कास पठारावर चरणाऱ्या जनावरांचे शेण, वन्यप्राण्यांची विष्ठा, मूत्र यापासून नैसिर्गिकरीत्या खताची निर्मिती होते. पठारावर वाढणाऱ्या वैविध्यपूर्ण वनस्पतींच्या वाढीसाठी हे खत पोषक ठरते. त्यामुळे परिसरात चरणाऱ्या जनावरांचा, तृणहारी वन्यप्राण्यांचा चारा वणव्यामुळे नष्ट होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान २०११-१२ या सालात पडलेल्या दुष्काळामुळे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून शेकडो टन ओला चारा या भागातून दुष्काळी भागात पाठविण्यात आला होता. यामुळे असंख्य गुरांना जीवनदान मिळाले होते. कास परिसराने केवळ फुलांचाच वारसा जपला नाही, तर या परिसरातील असंख्य गावांनी माणुसकीचाही वारसा जपल्याचं या निमित्तांनं अधोरेखित झालं आहे.