शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

पुलाच्या भगदाडास डांबरी ठिगळ

By admin | Updated: March 10, 2017 22:52 IST

पाचवडमध्ये डोळेझाक : भविष्यात ‘भुर्इंज’ घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता

पाचवड : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाचवड, ता. वाई येथील उड्डाणपुलास गुरुवारी सिमेंटचा काही भाग तुटून भगदाड पडल्याची घटना घडली अन् पाचवडकरांच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखे झाले. काही दिवसांपूर्वी भुर्इंज येथील उड्डाणपूल खचून कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता पाचवडच्या उड्डाणपुलाचीही रिलायन्स कंपनी व आयटीडीच्या ठेकदारांनी निकृष्ट काम करून पाडापाडीची मालिका सुरूच ठेवल्याने आपल्या दर्जाहीन कामाची जणू पोच पावतीच दिली असल्याची संतप्त भावना पाचवडकरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पडलेल्या भगदाडाचे कोणतेही निरीक्षण सक्षम अधिकाऱ्यांकडून न करता त्यावर तात्पुरते पॅचवर्क करून भगदाड झाकून टाकण्याचे काम ठेकेदारांनी केले असून, त्याठिकाणी भविष्यात मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम देशाच्या विकासाचे जरी असले तरी सुरुवातीपासूनच ते शेतकरी व नागरिकांच्या जणू जीवावर उठल्यासारखेच आहे. रिलायन्सच्या ठेकेदारांनी मनमानी कारभार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सहापदरीकरणात केल्याने आजपर्यंत अनेकांना महामार्गावर आपले प्राण सोडावे लागले आहेत. भुर्इंजचा उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी एका बाजूने सुरू केला असून, पाचवडचा उड्डाणपूलही लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र, अचानक उड्डाणपुलास भगदाड पडल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, गुरुवारी रात्रभर पडलेल्या भगदाडाच्या खालील बाजूकडून वेल्डिंग व इतर काम केल्यानंतर शुक्रवारी उड्डाणपुलावर डांबर टाकून पॅच मारण्याचे काम रिलायन्सच्या ठेकदारांकडून सुरू होते. जिल्हा प्रशासकीय अधिकारी अथवा नॅशनल हायवे अ‍ॅथॉरटीचा सक्षम अधिकारी या उड्डाणपुलाकडे फिरकलाही नाही. (वार्ताहर)सहापदरीकरणाचे काम ग्रामस्थांच्या मुळावर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम पाचवडकरांच्या जणू मुळावरच उठले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओढ्यांचे प्रवाह सोडण्यापासून ते उड्डाणपुलास भगदाड पडण्यापर्यंत होत आलेले काम पाचवडकरांसाठी मोठी डोकेदुखीच ठरलेली आहे. येथील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनही वारंवार तोडून नागरिकांबरोबरच येथील ग्रामपंचायतीलाही आजपर्यंत अतोनात नुकसान सोसावे लागले आहे. आपल्या दैनंदिन कामासाठी उड्डाणपुलाखालून ये-जा करणारा येथील स्थानिक नागरिकभगदाड पडल्यापासून घाबरला असून, आपला जीव मुठीत घेऊनच या पुलाखालून तो जात आहे. ठेकेदारांचा रात्रीस खेळ चालेआजपर्यंत रात्रीचे काम करून बाजारपेठेतील पाचवडकरांची झोप उडवलेल्या महामार्गाच्या ठेकेदारांनी गुरुवारची रात्रही भगदाड मुजविण्यात घालविली. पडलेले भगदाड मुजवण्यासाठी रात्रीचा खेळ करून भगदाडास लिपण लावण्याचे काम या ठेकेदारांनी केले. मात्र, त्यांचा चाललेला रात्रीचा खेळ पाचवडकरांना भविष्यात किती किंमत मोजायला लावणार हे येणारा काळच सांगेल.