शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यासाठी उघडले किल्ल्याचे दक्षिणद्वार!

By admin | Updated: February 19, 2016 00:19 IST

अजिंक्यतारा : प्राण्यांना ये-जा करण्यासाठी केली गेली होती मागणी '

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याला दक्षिण बाजूकडे नव्याने बसविण्यात आलेल्या दरवाजामुळे वन्यप्राण्यांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला असल्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरात सुरू होती. याची दखल घेऊन बुधवारी काही प्राणिमित्रांनी हा दरवाजा वन्यप्राण्यांसाठी उघडला. ऐतिहासिक वारसा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याला काही दिवसांपूर्वी दक्षिण बाजूकडील दरवाजा नव्याने बसविण्यात आला. हा दरवाजा बंद असल्यामुळे वन्यप्राण्यांचा मार्ग खुंटत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. दरवाजा बंद अवस्थेत असल्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीत घुसत असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. वन्यप्राण्यांचा मार्ग बंद झाल्याने प्राणी अडकून राहतात. यासाठी हा दरवाजा सतत उघडा असणे गरजेचे आहे, अशी मागणी होत होती. त्यामुळे बुधवारी प्रशांत बोबडे, सचिन कल्याणी, दिग्विजय तोडकर या काही प्राणिमित्रांनी दुपारी हा दरवाजा संपूर्ण उघडला. दरम्यान, दरवाजा बंद असला तरी प्राणी केवळ याच दरवाजातून ये-जा करतील असे नाही. किल्ल्यावर इतर मार्ग असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शाहूनगरच्या बाजूने तटावर येणास जागा आहे. बिबट्या या बाजूने पाणी पिण्यासाठी किल्ल्यावरील बावडीशेजारील तळ्यावर जाताना लोकांनी पाहिले आहे. एक मार्ग बंद झाला तरी प्राणी दुसरा मार्ग शोधतात. दक्षिण दरवाजा प्राण्यांसाठी अपायकारक नाही आणि उपकारकही नाही, असेही प्राणिमित्रांनी सांगितले. हा नवीन दरवाजा प्रशासनाने बंद केला नव्हता. कुणीतरी अज्ञाताने हे दार बंद केले असले तरी वन्यप्राण्यांचा मार्ग खुंटत नव्हता. प्राण्यांना ये-जा करण्यासाठी किल्ल्यावर इतर मार्गही आहेतच. मात्र, सोशल मीडियावर चर्चा करण्यात जेवढा वेळ घालविला गेला, तेवढ्या वेळात किल्ल्यावर जाऊन दरवाजा उघडता आला असता.- अभिजित बापट, मुख्याधिकारी, नगरपालिकाकिल्ल्यावर पाणीसाठ्याची गरजउन्हाळ्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्यावर असलेले पाणीसाठे आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत आहे. तसेच वणव्यामुळे झाडेझुडपे जळाली असून प्राण्यांना निवाराही राहिला नाही. दगडाच्या कपारी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी वन्यप्राणी आसरा घेत नाहीत. वन्यजीवांसाठी किल्ल्यावर पाणीसाठ्याची गरज निर्माण झाली आहे.