शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, ६ तालुक्यांत गारपीट; ५१ गावांना फटका

By नितीन काळेल | Updated: April 17, 2023 20:58 IST

अवकाळीचा घात लाखांत, वळवाचा ७ कोटींत, वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे.

सातारा : जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आताच्या वळवाच्या तडाख्याचाही शेकडो बळीराजाला फटका बसलाय. अवघ्या आठवड्यातच ६ तालुक्यांत गारपीट झाली असून ५१ गावे बाधित आहेत. यामध्ये ३५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असेलतरी फळबागांची हानी अधिक आहे. त्यामुळे अवकाळीत लाखांत असलीतरी आता ७ कोटींवर हानी झाल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात नुकसान झाले होते. सर्वाधिक नुकसान हे वाई तालुक्यात झाले होते. वाईत फळपिके सोडून बागायत पिकांखालील बाधित क्षेत्र हे २२० हेक्टर होते, तर याचा फटका १,१९७ शेतकऱ्यांना बसलेला. महाबळेश्वर तालुक्यात ६४ हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे बाधित झाली. यामुळे २४० बळीराजांचे नुकसान झाले होते. तर माण तालुक्यात १९ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि ११ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला. माण तालुक्यात एकूण अवकाळी बाधित क्षेत्र हे ३० हेक्टर, तर ६० शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले हाेते. यामधून शेतकरी सावरत असतानाच आठ दिवसांपासून वळवाचा तडाखा जिल्ह्यात बसत आहे. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे पुन्हा मोडले आहे.

जिल्ह्यात ७ एप्रिलला जोरदार वारे आणि वळवाचा पाऊस व गारपीट झाली होती. तर मागील चार दिवसांतही जिल्ह्यात पाऊस झाला आहे. यामध्ये गारपीटच अधिक होती. याचा फटका शेती पिकाला कमी बसलेला आहे. मात्र, फळबागांचे नुकसान अधिक झालेले आहे. जिल्ह्यातील शेती क्षेत्राची नजरअंदाजे नुकसानीची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आठवडाभरातील वळीव पाऊस आणि गारपिटीचा ३४६ हेक्टरला फटका बसलेला आहे. तर बाधित गावांची संख्या ५१ दिसून आलेली आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू असल्याने नुकसानीचा खरा आकडा लवकरच समोर येणार आहे. तरीही शेतकऱ्यांच्या माहितीनुसार अंदाजे ७ कोटींहून अधिक नुकसान झालेले आहे.

वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये अधिक करुन द्राक्षबागांचेच नुकसान आहे. कोरेगाव तालुक्यातही गारपीट होऊन १८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातीलही ६ गावांना दणका बसला आहे. माण तालुक्यातील ४ गावांत गारपिट झाली. यामध्ये ४३ हेक्टरवरील बागा आणि पिकांना फटका बसलाय. महाबळेश्वर तालुक्यात ४८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. १७ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तर खंडाळा तालुक्यात ६ गावे बाधित असून १० हेक्टरवरील पिके आणि बागांचे नुकसान झाले आहे. जावळीत ५ गावांतील ३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आता झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे पिके आणि फळबागांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवत आहोत. तर पंचनामे सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. - भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अवकाळीत ८६ लाख रुपयांचे नुकसान...

अवकाळी पावसाचा तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला होता. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झाले होते. वाई तालुक्यात सर्वाधिक ५९ लाख ३२ हजारांचे नुकसान झालेले. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात १७ लाख २८ हजार, तर माणमध्ये ९ लाख १४ हजारांचे नुकसान झाले होते.