शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, ६ तालुक्यांत गारपीट; ५१ गावांना फटका

By नितीन काळेल | Updated: April 17, 2023 20:58 IST

अवकाळीचा घात लाखांत, वळवाचा ७ कोटींत, वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे.

सातारा : जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आताच्या वळवाच्या तडाख्याचाही शेकडो बळीराजाला फटका बसलाय. अवघ्या आठवड्यातच ६ तालुक्यांत गारपीट झाली असून ५१ गावे बाधित आहेत. यामध्ये ३५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असेलतरी फळबागांची हानी अधिक आहे. त्यामुळे अवकाळीत लाखांत असलीतरी आता ७ कोटींवर हानी झाल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात नुकसान झाले होते. सर्वाधिक नुकसान हे वाई तालुक्यात झाले होते. वाईत फळपिके सोडून बागायत पिकांखालील बाधित क्षेत्र हे २२० हेक्टर होते, तर याचा फटका १,१९७ शेतकऱ्यांना बसलेला. महाबळेश्वर तालुक्यात ६४ हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे बाधित झाली. यामुळे २४० बळीराजांचे नुकसान झाले होते. तर माण तालुक्यात १९ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि ११ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला. माण तालुक्यात एकूण अवकाळी बाधित क्षेत्र हे ३० हेक्टर, तर ६० शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले हाेते. यामधून शेतकरी सावरत असतानाच आठ दिवसांपासून वळवाचा तडाखा जिल्ह्यात बसत आहे. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे पुन्हा मोडले आहे.

जिल्ह्यात ७ एप्रिलला जोरदार वारे आणि वळवाचा पाऊस व गारपीट झाली होती. तर मागील चार दिवसांतही जिल्ह्यात पाऊस झाला आहे. यामध्ये गारपीटच अधिक होती. याचा फटका शेती पिकाला कमी बसलेला आहे. मात्र, फळबागांचे नुकसान अधिक झालेले आहे. जिल्ह्यातील शेती क्षेत्राची नजरअंदाजे नुकसानीची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आठवडाभरातील वळीव पाऊस आणि गारपिटीचा ३४६ हेक्टरला फटका बसलेला आहे. तर बाधित गावांची संख्या ५१ दिसून आलेली आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू असल्याने नुकसानीचा खरा आकडा लवकरच समोर येणार आहे. तरीही शेतकऱ्यांच्या माहितीनुसार अंदाजे ७ कोटींहून अधिक नुकसान झालेले आहे.

वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये अधिक करुन द्राक्षबागांचेच नुकसान आहे. कोरेगाव तालुक्यातही गारपीट होऊन १८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातीलही ६ गावांना दणका बसला आहे. माण तालुक्यातील ४ गावांत गारपिट झाली. यामध्ये ४३ हेक्टरवरील बागा आणि पिकांना फटका बसलाय. महाबळेश्वर तालुक्यात ४८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. १७ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तर खंडाळा तालुक्यात ६ गावे बाधित असून १० हेक्टरवरील पिके आणि बागांचे नुकसान झाले आहे. जावळीत ५ गावांतील ३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आता झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे पिके आणि फळबागांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवत आहोत. तर पंचनामे सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. - भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अवकाळीत ८६ लाख रुपयांचे नुकसान...

अवकाळी पावसाचा तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला होता. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झाले होते. वाई तालुक्यात सर्वाधिक ५९ लाख ३२ हजारांचे नुकसान झालेले. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात १७ लाख २८ हजार, तर माणमध्ये ९ लाख १४ हजारांचे नुकसान झाले होते.