शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, ६ तालुक्यांत गारपीट; ५१ गावांना फटका

By नितीन काळेल | Updated: April 17, 2023 20:58 IST

अवकाळीचा घात लाखांत, वळवाचा ७ कोटींत, वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे.

सातारा : जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आताच्या वळवाच्या तडाख्याचाही शेकडो बळीराजाला फटका बसलाय. अवघ्या आठवड्यातच ६ तालुक्यांत गारपीट झाली असून ५१ गावे बाधित आहेत. यामध्ये ३५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असेलतरी फळबागांची हानी अधिक आहे. त्यामुळे अवकाळीत लाखांत असलीतरी आता ७ कोटींवर हानी झाल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात नुकसान झाले होते. सर्वाधिक नुकसान हे वाई तालुक्यात झाले होते. वाईत फळपिके सोडून बागायत पिकांखालील बाधित क्षेत्र हे २२० हेक्टर होते, तर याचा फटका १,१९७ शेतकऱ्यांना बसलेला. महाबळेश्वर तालुक्यात ६४ हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे बाधित झाली. यामुळे २४० बळीराजांचे नुकसान झाले होते. तर माण तालुक्यात १९ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि ११ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला. माण तालुक्यात एकूण अवकाळी बाधित क्षेत्र हे ३० हेक्टर, तर ६० शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले हाेते. यामधून शेतकरी सावरत असतानाच आठ दिवसांपासून वळवाचा तडाखा जिल्ह्यात बसत आहे. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे पुन्हा मोडले आहे.

जिल्ह्यात ७ एप्रिलला जोरदार वारे आणि वळवाचा पाऊस व गारपीट झाली होती. तर मागील चार दिवसांतही जिल्ह्यात पाऊस झाला आहे. यामध्ये गारपीटच अधिक होती. याचा फटका शेती पिकाला कमी बसलेला आहे. मात्र, फळबागांचे नुकसान अधिक झालेले आहे. जिल्ह्यातील शेती क्षेत्राची नजरअंदाजे नुकसानीची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आठवडाभरातील वळीव पाऊस आणि गारपिटीचा ३४६ हेक्टरला फटका बसलेला आहे. तर बाधित गावांची संख्या ५१ दिसून आलेली आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू असल्याने नुकसानीचा खरा आकडा लवकरच समोर येणार आहे. तरीही शेतकऱ्यांच्या माहितीनुसार अंदाजे ७ कोटींहून अधिक नुकसान झालेले आहे.

वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये अधिक करुन द्राक्षबागांचेच नुकसान आहे. कोरेगाव तालुक्यातही गारपीट होऊन १८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातीलही ६ गावांना दणका बसला आहे. माण तालुक्यातील ४ गावांत गारपिट झाली. यामध्ये ४३ हेक्टरवरील बागा आणि पिकांना फटका बसलाय. महाबळेश्वर तालुक्यात ४८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. १७ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तर खंडाळा तालुक्यात ६ गावे बाधित असून १० हेक्टरवरील पिके आणि बागांचे नुकसान झाले आहे. जावळीत ५ गावांतील ३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आता झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे पिके आणि फळबागांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवत आहोत. तर पंचनामे सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. - भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अवकाळीत ८६ लाख रुपयांचे नुकसान...

अवकाळी पावसाचा तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला होता. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झाले होते. वाई तालुक्यात सर्वाधिक ५९ लाख ३२ हजारांचे नुकसान झालेले. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात १७ लाख २८ हजार, तर माणमध्ये ९ लाख १४ हजारांचे नुकसान झाले होते.