शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कासला मशिनरींची धडधड थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:56 IST

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम १ मार्च २०१८ पासून युद्धपातळीवर सुरू झाले ...

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम १ मार्च २०१८ पासून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. आत्तापर्यंत एकूण धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच धरणाचे मातीकाम ९५ टक्के पूर्ण झाले असून, पिचिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मान्सूनचा पाऊस दाखल होत असल्याने धरणाचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्यात आले असून, दिवाळीनंतर कामास पुन्हा वेग येणार आहे.सातारा शहराला कास, शहापूर योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. कास ही सर्वात जुनी पाणी पुरवठा योजना आहे. उन्हाळा सुरू होताच पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागते. पाणीसाठा शेवटी-शेवटी पाच ते सहा फुटांवर येतो. यंदाच्या वर्षी अगदी साडेतीन फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. वाढते शहरीकरण आणि पाण्याची दैंनदिन गरज पाहता १ मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.धरणाची उंची वाढविण्याच्या कामी आत्तापर्यंत मातीकाम, रॉकटो (दगडी कोपरा), ट्रॅशरॅक स्ट्रक्चर, एलड्रेन व क्रॉस ड्रेनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच शीर्षविमोचकाच्या पाईपलाईन अंथरण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या शीर्षविमोचकाच्या कामी पाईपलाईन अंथरण्यासाठी चारही बाजूला क्राँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. वरच्या बाजूला (उर्ध्व बाजू-पाण्याकडची बाजू) धरणाच्या पोटात सत्तर मीटर लांबीची लोखंडी पाईप अंथरली आहे. अधो बाजूकडील म्हणजेच पाटाकडेच्या बाजूचे साधारण तीस मीटर लांबीची लोखंडी पाईपलाईन व काँक्रिटीकरणचे काम झाले आहे. उर्वरित काम दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार आहे.सर्व्हिस गेट व इमर्जन्सी गेट खाली-वर होण्यासाठी स्लॉट बसवण्यात आले आहेत. या गेटचे काम दिवाळीनंतर करण्यात येणार आहे. एकंदरीत धरणाचे वीस टक्के काम शिल्लक असून, मे २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. सांडव्याचे खोदकाम झाले असून, उर्वरित सांडव्याचे काम दिवाळीनंतर केले जाणार आहे. त्यामुळे धरणात मोठा पाणीसाठी होण्याची संकेत मिळत आहे.विहिरीचे काम एक मीटरपर्यंत पूर्णविहिरीचे काम जमिनीच्या वर एक मीटरपर्यंत झाले असून, त्यावर सुरक्षिततेसाठी लोखंडी प्लेटा टाकून झाकण्यात आले आहे. तसेच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्याच्या वाहणाºया पाण्याने धरणाला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही, याची जलसंपदा विभागाकडून दक्षता घेतली आहे.