शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुरुमाच्या भरावामुळे कोयनाकाठ धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:51 IST

तांबवे : येथील कोयना नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीच्या पात्रात मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने तांबवे बाजूची मळी नावाची शेतजमीन पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेली आहे. या कोयना नदीकाठी केलेल्या मुरूम व माती उत्खनानंतर ठेकेदाराने ...

तांबवे : येथील कोयना नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीच्या पात्रात मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने तांबवे बाजूची मळी नावाची शेतजमीन पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेली आहे. या कोयना नदीकाठी केलेल्या मुरूम व माती उत्खनानंतर ठेकेदाराने वेळेत भराव न काढल्याने जमीन वाहून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.तांबवे गाव कोयना नदीकाठी वसलेले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. नदीकाठची शेतजमीन पाण्याखाली जाते. येथील पूल ही पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होते. म्हणून येथे १२ कोटी ९६ लाख रुपयांचा नवीन उंच मोठा पूल मंजूर झाला आहे. त्याचे काम गतवर्षीपासून सुरू आहे. या पुलाचे काम एका कंपनीकडे आहे. या पुलाच्या कामासाठी नदीमध्ये भराव करून काम केले आहे. पुलाचे पिलरचे काम पूर्ण झाले. आता पुलाचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे.पाऊस भरपूर पडल्याने व कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा वेग हा जादा झाला आहे. एका बाजूला भराव असल्याने तांबवेच्या बाजूला पाण्याची वेग मर्यादा वाढल्याने शेतजमीन वाहून गेली आहे. मळीची जमीन सुमारे दहा ते पंधरा फूट तुटून वाहून गेली आहे. ठेकेदाराने वेळीच भराव न काढलेल्यामुळे ही जमीन तुटली असल्याचा असा आरोप शेतकºयांनी केला आहे. शेतकºयांनी संबंधित ठेकेदारास सांगूनही त्याने नदीच्या एका बाजूचा भराव काढलेला नाही. याबाबत शेतकरी नीलेशभोसले यांनी बांधकाम विभाग व ठेकेदाराला निवेदन व माहिती दिली आहे.तरीही याकडे बांधकाम विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे. आता पुलाचे कामही झाले आहे. त्यामुळे तातडीने नदीमधील भराव काढून टाकण्यात यावा व बाधित शेतकºयांना त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.नदीकाठाचे नुकसान तर नव्या रस्त्याची दुरवस्थातांबवे-साकुर्डी फाटा या दरम्यानच्या रस्त्याचे गत काही महिन्यांपूर्वीच काम करण्यात आले होते. ठेकेदाराकडून या मार्गावर नवीन पद्धतीने रस्ता केला होता. मात्र, वाळू तसेच माती वाहतूक करणाºयांमुळे या रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. तांबवे येथील जुन्या पुलालगत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने त्यातून रात्रीच्यावेळी दुचाकी वाहनचालक भरधाव जात असताना घसरून किरकोळ जखमीही झालेले आहेत.