शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या कमी फेऱ्यामुळे वडाप जोमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

वाई : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. या काळात एसटी सेवा ही पूर्णपणे बंद होती. परंतु अलीकडच्या तीन ...

वाई : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. या काळात एसटी सेवा ही पूर्णपणे बंद होती. परंतु अलीकडच्या तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग कमी होऊन व्हॅक्सिनही आल्याने काही प्रमाणात एसटी सेवा सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र एसटीच्या कमी फेऱ्यांमुळे ग्रामीण भागात वडाप सुसाट धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास असूनही वडापचा आधार घ्यावा लागत आहे.

शासनाने २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आणि २७ जानेवारीला पाचवी ते आठवी वर्ग सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर मुले प्रवास करू लागली; परंतु अजून बहुतांश गावांना पूर्वीप्रमाणे नियमित एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.

वाई आगारात एकूण ६५ बस असून, पैकी ५८ बस सध्या कार्यरत आहेत. काही बस दुसऱ्या आगारांकडे वर्ग केल्या आहेत. वाई तालुक्यातील ग्रामीण भागात यापूर्वी एकूण १८० फेऱ्या होत होत्या. परंतु आता १२० फेऱ्या सुरू असल्यामुळे मुख्य मार्गावर काही फेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अनेक गावांची अजूनही बससेवा सुरू नाही. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी असल्यामुळे खासगी वडाप मात्र तेजीत चालले आहे, त्याचा फायदा वडापवाल्यांनी पुरेपूर उठविला असून, नागरिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चाकरमानी, शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचे एसटी पासेस असताना त्यांना दररोज जादा भाड्याचा फटका सहन करावा लागत आहे. तरी शेवटच्या थांब्याच्या गावांपर्यंत एसटी बसच्या फेऱ्या त्वरित सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी, प्रवासी यांच्याकडून करण्यात येत आहे.

कोट..

सध्या तालुका, जिल्ह्याबाहेरील लांब पल्ल्याच्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू आहेत. वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य मार्गावरील बससेवा सुरू केली आहे. अजून काही गावांना बससेवा बंद असून, टप्प्याटप्प्याने बंद फेऱ्याही चालू केल्या जातील.

-जी.एम. कोळी, वाई आगार व्यवस्थापक

फोटो....

०४वाई

वाई तालुक्यातील बहुतांश गावांना पूर्वीप्रमाणे नियमित एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.