शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

एसटीच्या कमी फेऱ्यामुळे वडाप जोमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

वाई : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. या काळात एसटी सेवा ही पूर्णपणे बंद होती. परंतु अलीकडच्या तीन ...

वाई : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. या काळात एसटी सेवा ही पूर्णपणे बंद होती. परंतु अलीकडच्या तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग कमी होऊन व्हॅक्सिनही आल्याने काही प्रमाणात एसटी सेवा सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र एसटीच्या कमी फेऱ्यांमुळे ग्रामीण भागात वडाप सुसाट धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास असूनही वडापचा आधार घ्यावा लागत आहे.

शासनाने २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आणि २७ जानेवारीला पाचवी ते आठवी वर्ग सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर मुले प्रवास करू लागली; परंतु अजून बहुतांश गावांना पूर्वीप्रमाणे नियमित एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.

वाई आगारात एकूण ६५ बस असून, पैकी ५८ बस सध्या कार्यरत आहेत. काही बस दुसऱ्या आगारांकडे वर्ग केल्या आहेत. वाई तालुक्यातील ग्रामीण भागात यापूर्वी एकूण १८० फेऱ्या होत होत्या. परंतु आता १२० फेऱ्या सुरू असल्यामुळे मुख्य मार्गावर काही फेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अनेक गावांची अजूनही बससेवा सुरू नाही. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी असल्यामुळे खासगी वडाप मात्र तेजीत चालले आहे, त्याचा फायदा वडापवाल्यांनी पुरेपूर उठविला असून, नागरिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चाकरमानी, शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचे एसटी पासेस असताना त्यांना दररोज जादा भाड्याचा फटका सहन करावा लागत आहे. तरी शेवटच्या थांब्याच्या गावांपर्यंत एसटी बसच्या फेऱ्या त्वरित सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी, प्रवासी यांच्याकडून करण्यात येत आहे.

कोट..

सध्या तालुका, जिल्ह्याबाहेरील लांब पल्ल्याच्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू आहेत. वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य मार्गावरील बससेवा सुरू केली आहे. अजून काही गावांना बससेवा बंद असून, टप्प्याटप्प्याने बंद फेऱ्याही चालू केल्या जातील.

-जी.एम. कोळी, वाई आगार व्यवस्थापक

फोटो....

०४वाई

वाई तालुक्यातील बहुतांश गावांना पूर्वीप्रमाणे नियमित एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.