शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

‘लोकमत’ च्या वृत्तामुळे दिव्यांग विद्यार्थीनींचे विद्यावेतन बँक खात्यांत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 14:15 IST

सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.

ठळक मुद्दे४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर पैसे जमापालकांमध्ये आनंद ‘लोकमत’ मुळे न्याय मिळाल्याची व्यक्त केली भावना

सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.

‘लोकमत’ ने बुधवार, दि. ९ आॅगस्टच्या अंकात ‘दिव्यांगांचे विद्यावेतन रखडले,’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. दिव्यांग विद्यार्थीनींना दिले जाणारे विद्यावेतन रखडल्याने पालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पालकांच्या येणाºया प्रतिक्रिया लक्षात घेऊन ‘लोकमत’ ने या विद्यार्थींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्याला तत्काळ यश आले.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानामार्फत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) विद्यार्थीनींना दरमहा २00 रुपये इतका प्रोत्साहन भत्ता दिला जातो. दिव्यांग विद्यार्थीनी शालाबाह्य होऊन त्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये, हा या प्रोत्साहन भत्त्यामागचा हेतू आहे. संबंधित विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर तो जमा केला जातो.

सन २0१६-१७ या आर्थिक वर्षातील हा प्रोत्साहन भत्ता (विद्यावेतन) मिळाले नव्हते. दिव्यांगांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत शासनही दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार पुढे येत असताना त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट त्यांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्यही वेळेत दिले जात नसल्याने दिव्यांग विद्यार्थीनींचे पालक अस्वस्थ झाले होते.

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माध्यमिक विभागातील संबंधित वरिष्ठ सहायकाला नोटीस काढले. तसेच विद्यावेतन का रखडवले आहे?, याची विचारणा केली. त्यावर ३१ मार्च रोजी बँकेकडे याद्या दिल्या होत्या. मात्र, बँकेने वेगवेगळ्या पध्दतीने याद्यांची मागणी केली, त्यामुळे हे विद्यावेतन रखडल्याचे सांगितले. तरीही एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांच्या कालावधीत बँकेने मागितलेल्या पध्दतीनुसार माहिती का दिली गेली नाही?, अशी शंका काढून महत्त्वाच्या कारण नसल्याचे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मार्च २0१६ ते मार्च २0१७ या कालावधीत बारा महिन्यांपैकी दहा महिन्यांसाठी दिले जाणारे ८ लाख २६ हजार रुपयांचे एकूण विद्यावेतन रखडलेले होते. जिल्हा परिषदेने बुधवारीच हा चेक बँकेकडे वर्ग केला आहे. ४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर गुरुवारी हे पैसे जमा झाले आहेत.- डॉ. राजेश देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद