शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

‘लोकमत’ च्या वृत्तामुळे दिव्यांग विद्यार्थीनींचे विद्यावेतन बँक खात्यांत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 14:15 IST

सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.

ठळक मुद्दे४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर पैसे जमापालकांमध्ये आनंद ‘लोकमत’ मुळे न्याय मिळाल्याची व्यक्त केली भावना

सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.

‘लोकमत’ ने बुधवार, दि. ९ आॅगस्टच्या अंकात ‘दिव्यांगांचे विद्यावेतन रखडले,’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. दिव्यांग विद्यार्थीनींना दिले जाणारे विद्यावेतन रखडल्याने पालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पालकांच्या येणाºया प्रतिक्रिया लक्षात घेऊन ‘लोकमत’ ने या विद्यार्थींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्याला तत्काळ यश आले.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानामार्फत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) विद्यार्थीनींना दरमहा २00 रुपये इतका प्रोत्साहन भत्ता दिला जातो. दिव्यांग विद्यार्थीनी शालाबाह्य होऊन त्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये, हा या प्रोत्साहन भत्त्यामागचा हेतू आहे. संबंधित विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर तो जमा केला जातो.

सन २0१६-१७ या आर्थिक वर्षातील हा प्रोत्साहन भत्ता (विद्यावेतन) मिळाले नव्हते. दिव्यांगांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत शासनही दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार पुढे येत असताना त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट त्यांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्यही वेळेत दिले जात नसल्याने दिव्यांग विद्यार्थीनींचे पालक अस्वस्थ झाले होते.

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माध्यमिक विभागातील संबंधित वरिष्ठ सहायकाला नोटीस काढले. तसेच विद्यावेतन का रखडवले आहे?, याची विचारणा केली. त्यावर ३१ मार्च रोजी बँकेकडे याद्या दिल्या होत्या. मात्र, बँकेने वेगवेगळ्या पध्दतीने याद्यांची मागणी केली, त्यामुळे हे विद्यावेतन रखडल्याचे सांगितले. तरीही एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांच्या कालावधीत बँकेने मागितलेल्या पध्दतीनुसार माहिती का दिली गेली नाही?, अशी शंका काढून महत्त्वाच्या कारण नसल्याचे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मार्च २0१६ ते मार्च २0१७ या कालावधीत बारा महिन्यांपैकी दहा महिन्यांसाठी दिले जाणारे ८ लाख २६ हजार रुपयांचे एकूण विद्यावेतन रखडलेले होते. जिल्हा परिषदेने बुधवारीच हा चेक बँकेकडे वर्ग केला आहे. ४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर गुरुवारी हे पैसे जमा झाले आहेत.- डॉ. राजेश देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद