शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘लोकमत’ च्या वृत्तामुळे दिव्यांग विद्यार्थीनींचे विद्यावेतन बँक खात्यांत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 14:15 IST

सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.

ठळक मुद्दे४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर पैसे जमापालकांमध्ये आनंद ‘लोकमत’ मुळे न्याय मिळाल्याची व्यक्त केली भावना

सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.

‘लोकमत’ ने बुधवार, दि. ९ आॅगस्टच्या अंकात ‘दिव्यांगांचे विद्यावेतन रखडले,’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. दिव्यांग विद्यार्थीनींना दिले जाणारे विद्यावेतन रखडल्याने पालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पालकांच्या येणाºया प्रतिक्रिया लक्षात घेऊन ‘लोकमत’ ने या विद्यार्थींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्याला तत्काळ यश आले.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानामार्फत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) विद्यार्थीनींना दरमहा २00 रुपये इतका प्रोत्साहन भत्ता दिला जातो. दिव्यांग विद्यार्थीनी शालाबाह्य होऊन त्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये, हा या प्रोत्साहन भत्त्यामागचा हेतू आहे. संबंधित विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर तो जमा केला जातो.

सन २0१६-१७ या आर्थिक वर्षातील हा प्रोत्साहन भत्ता (विद्यावेतन) मिळाले नव्हते. दिव्यांगांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत शासनही दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार पुढे येत असताना त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट त्यांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्यही वेळेत दिले जात नसल्याने दिव्यांग विद्यार्थीनींचे पालक अस्वस्थ झाले होते.

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माध्यमिक विभागातील संबंधित वरिष्ठ सहायकाला नोटीस काढले. तसेच विद्यावेतन का रखडवले आहे?, याची विचारणा केली. त्यावर ३१ मार्च रोजी बँकेकडे याद्या दिल्या होत्या. मात्र, बँकेने वेगवेगळ्या पध्दतीने याद्यांची मागणी केली, त्यामुळे हे विद्यावेतन रखडल्याचे सांगितले. तरीही एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांच्या कालावधीत बँकेने मागितलेल्या पध्दतीनुसार माहिती का दिली गेली नाही?, अशी शंका काढून महत्त्वाच्या कारण नसल्याचे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मार्च २0१६ ते मार्च २0१७ या कालावधीत बारा महिन्यांपैकी दहा महिन्यांसाठी दिले जाणारे ८ लाख २६ हजार रुपयांचे एकूण विद्यावेतन रखडलेले होते. जिल्हा परिषदेने बुधवारीच हा चेक बँकेकडे वर्ग केला आहे. ४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर गुरुवारी हे पैसे जमा झाले आहेत.- डॉ. राजेश देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद