शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ च्या वृत्तामुळे दिव्यांग विद्यार्थीनींचे विद्यावेतन बँक खात्यांत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 14:15 IST

सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.

ठळक मुद्दे४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर पैसे जमापालकांमध्ये आनंद ‘लोकमत’ मुळे न्याय मिळाल्याची व्यक्त केली भावना

सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.

‘लोकमत’ ने बुधवार, दि. ९ आॅगस्टच्या अंकात ‘दिव्यांगांचे विद्यावेतन रखडले,’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. दिव्यांग विद्यार्थीनींना दिले जाणारे विद्यावेतन रखडल्याने पालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पालकांच्या येणाºया प्रतिक्रिया लक्षात घेऊन ‘लोकमत’ ने या विद्यार्थींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्याला तत्काळ यश आले.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानामार्फत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) विद्यार्थीनींना दरमहा २00 रुपये इतका प्रोत्साहन भत्ता दिला जातो. दिव्यांग विद्यार्थीनी शालाबाह्य होऊन त्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये, हा या प्रोत्साहन भत्त्यामागचा हेतू आहे. संबंधित विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर तो जमा केला जातो.

सन २0१६-१७ या आर्थिक वर्षातील हा प्रोत्साहन भत्ता (विद्यावेतन) मिळाले नव्हते. दिव्यांगांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत शासनही दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार पुढे येत असताना त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट त्यांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्यही वेळेत दिले जात नसल्याने दिव्यांग विद्यार्थीनींचे पालक अस्वस्थ झाले होते.

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माध्यमिक विभागातील संबंधित वरिष्ठ सहायकाला नोटीस काढले. तसेच विद्यावेतन का रखडवले आहे?, याची विचारणा केली. त्यावर ३१ मार्च रोजी बँकेकडे याद्या दिल्या होत्या. मात्र, बँकेने वेगवेगळ्या पध्दतीने याद्यांची मागणी केली, त्यामुळे हे विद्यावेतन रखडल्याचे सांगितले. तरीही एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांच्या कालावधीत बँकेने मागितलेल्या पध्दतीनुसार माहिती का दिली गेली नाही?, अशी शंका काढून महत्त्वाच्या कारण नसल्याचे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मार्च २0१६ ते मार्च २0१७ या कालावधीत बारा महिन्यांपैकी दहा महिन्यांसाठी दिले जाणारे ८ लाख २६ हजार रुपयांचे एकूण विद्यावेतन रखडलेले होते. जिल्हा परिषदेने बुधवारीच हा चेक बँकेकडे वर्ग केला आहे. ४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर गुरुवारी हे पैसे जमा झाले आहेत.- डॉ. राजेश देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद