शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन नसल्याने कृषी अर्थव्यवस्था कोलमडली

By admin | Updated: September 6, 2016 01:39 IST

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाड तालुक्यात नवीन दोनशे शाळा खोल्या

कऱ्हाड : ‘विकासाचे अनेक कार्यक्रम सध्याच्या सरकारने बदलून टाकले आहेत. यातून आपला विकास सोडून विदर्भाचा विकास साधण्याचा सरकारचा हट्ट सुरू आहे. विदर्भाचा विकास झाला म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. परंतु त्यापोटी पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवणे चुकीचे आहे. सरकारकडे नियोजन नसल्याने कृषी अर्थव्यवस्था कोलमडली आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काले, ता. कऱ्हाड येथे जनविकास यौद्धा प्रतिष्ठान व पैलवान नानासाहेब पाटील मित्र परिवाराच्या वतीने गावामध्ये सुमारे पन्नास कडबाकुट्टी मशीनच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. माजी पोलिस पाटील शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे संचालक व जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, सर्जेराव शिंदे, कृष्णत थोरात, अ‍ॅड. ए. वाय. पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे संघटक उदय पाटील-उंडाळकर, प्रवक्ते पै. तानाजी चवरे, सेवादलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, सचिन काकडे, रणजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार चव्हाण म्हणाले, ‘काले हे गाव स्वावलंबी आहे; पण सोयी-सुविधांचा अभाव असल्याने त्या उभ्या करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट झालेली कामे परत जात नाहीत याची प्रचिती तुम्हाला आली आहे. तालुक्यातील मंजूर विकास कामांबाबत सुरुवातीला गैरसमज पसरवला गेला. परंतु ती कामे हळूहळू सुरू झाली आहेत. आमच्या सरकारच्या काळातील अनेक योजना नवीन सरकारने बंद केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रमही त्यांनी इतरत्र विलीन केला आहे. काले ते नारायणवाडी रस्त्याचे कामही सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडले आह; पण त्या रस्त्याचे काम पूर्ण करणारच. तालुक्यातील १८३ धोकादायक शाळा खोल्यांचा प्रस्ताव पाठवून याबाबत नवीन खोल्या मिळाव्यात म्हणून माझा पाठपुरावा सुरू आहे. खूप पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यात दोनशे शाळा खोल्या मंजूर झाल्या आहेत. शेतीत यांत्रिकीकरण केले पाहिजे. तंत्रज्ञानयुक्त अचूक शेती केल्यास पुढील दहा ते वीस वर्षे शाश्वत उत्पन्न शेतकरी घेऊ शकणार आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीवरील रोजगाराचा भार कमी होईल.’ यावेळी पै. नानासाहेब पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. आमदार चव्हाण यांच्या हस्ते विलास यादव, आनंदा देसाई, संदीप यादव, नंदकुमार मोहिते, विठ्ठल यादव, संदीप यादव, कृष्णत यादव, बापूसाहेब पाटील व श्रीमंत काकडे यांना कडबाकुट्टी मशीनचे वाटप करण्यात आले. तानाजी चवरे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)