शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

नियोजन नसल्याने कृषी अर्थव्यवस्था कोलमडली

By admin | Updated: September 6, 2016 01:39 IST

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाड तालुक्यात नवीन दोनशे शाळा खोल्या

कऱ्हाड : ‘विकासाचे अनेक कार्यक्रम सध्याच्या सरकारने बदलून टाकले आहेत. यातून आपला विकास सोडून विदर्भाचा विकास साधण्याचा सरकारचा हट्ट सुरू आहे. विदर्भाचा विकास झाला म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. परंतु त्यापोटी पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवणे चुकीचे आहे. सरकारकडे नियोजन नसल्याने कृषी अर्थव्यवस्था कोलमडली आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काले, ता. कऱ्हाड येथे जनविकास यौद्धा प्रतिष्ठान व पैलवान नानासाहेब पाटील मित्र परिवाराच्या वतीने गावामध्ये सुमारे पन्नास कडबाकुट्टी मशीनच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. माजी पोलिस पाटील शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे संचालक व जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, सर्जेराव शिंदे, कृष्णत थोरात, अ‍ॅड. ए. वाय. पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे संघटक उदय पाटील-उंडाळकर, प्रवक्ते पै. तानाजी चवरे, सेवादलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, सचिन काकडे, रणजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार चव्हाण म्हणाले, ‘काले हे गाव स्वावलंबी आहे; पण सोयी-सुविधांचा अभाव असल्याने त्या उभ्या करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट झालेली कामे परत जात नाहीत याची प्रचिती तुम्हाला आली आहे. तालुक्यातील मंजूर विकास कामांबाबत सुरुवातीला गैरसमज पसरवला गेला. परंतु ती कामे हळूहळू सुरू झाली आहेत. आमच्या सरकारच्या काळातील अनेक योजना नवीन सरकारने बंद केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रमही त्यांनी इतरत्र विलीन केला आहे. काले ते नारायणवाडी रस्त्याचे कामही सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडले आह; पण त्या रस्त्याचे काम पूर्ण करणारच. तालुक्यातील १८३ धोकादायक शाळा खोल्यांचा प्रस्ताव पाठवून याबाबत नवीन खोल्या मिळाव्यात म्हणून माझा पाठपुरावा सुरू आहे. खूप पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यात दोनशे शाळा खोल्या मंजूर झाल्या आहेत. शेतीत यांत्रिकीकरण केले पाहिजे. तंत्रज्ञानयुक्त अचूक शेती केल्यास पुढील दहा ते वीस वर्षे शाश्वत उत्पन्न शेतकरी घेऊ शकणार आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीवरील रोजगाराचा भार कमी होईल.’ यावेळी पै. नानासाहेब पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. आमदार चव्हाण यांच्या हस्ते विलास यादव, आनंदा देसाई, संदीप यादव, नंदकुमार मोहिते, विठ्ठल यादव, संदीप यादव, कृष्णत यादव, बापूसाहेब पाटील व श्रीमंत काकडे यांना कडबाकुट्टी मशीनचे वाटप करण्यात आले. तानाजी चवरे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)