शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी अपघातांत वाढ!

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

दोन वर्षांचा अनुभव : अरुंद रस्त्यांमुळे फलटण तालुक्यात घडताहेत प्रकार--पंढरीची वाट लई अवघड :५

नीलेश सोनवलकर -दुधेबावी -श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण तालुक्यात आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक दिंड्या सहभागी होत असतात. तसेच अनेक वारकरी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे अरुंद रस्त्यावर ताण येत आहे. त्यातून अपघातांच्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिंगणापूर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री क्षेत्र भिवाई कांबळेश्वर, श्री क्षेत्र धुळोबा धुळदेव येथील पालख्या सहभागी होत असतात. पालख्या, वारकरी रस्त्याने चाललेले असतात. त्याचवेळी अनेक वाहने भरधावपणे जात असतात. पालखीचा फलटणनंतरचा मुक्काम बरड येथे असल्याने परिसरातील शेकडो भाविक येतात. बरडला दोन दिवसांचा मुक्काम असल्याने पुणे-पंढरपूर मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्या काळात दोन दिवस वाहतूक वळविणे गरजेचे असते. दोन दिवसांच्या कालावधीत पोलिसांना योग्य अंतरावर थांबवून वाहतुकीची व्यवस्थापन करण्याची गरज आहे. पावसामुळे पालखी मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचत असतात. अवजड वाहन गेल्याने खड्डे पडल्याने त्या भरून घ्याव्यात, म्हणजे कसरत करावी लागणार नाही. तसेच काटेरी झुडपांमुळे वाहने दिसत नाहीत. त्यामुळे झुडपे काढल्यास नक्कीच अपघात टाळता येतील.आपत्कालीन यंत्रणा हवीय सावध...लोणंदजवळ दोन वर्षांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यावेळी चांगली आरोग्य सेवा पुरविली होती. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यात भविष्यात कधी अनावधनाने अपघात झालेच तर तातडीने आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करावी.