शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

लहरी निसर्गाच्या अवकृपेमुळे खरिपातील पीक उत्पादनात घट

By admin | Updated: November 22, 2014 00:17 IST

हवामानाचा परिणाम : दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल

कोपर्डे हवेली : प्रतिकूल हवामानामुळे व अवेळी पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. निघालेल्या उत्पादनाला बाजारपेठेत नीचांकी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. खरीप हंगामातील पिकांना सुरुवातीस पावसाने ओढ दिली. काही ठिकाणी पेरण्या झाल्या; पण उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरण्या झाल्या आणि पावसाने सुरुवात केली. सुमारे सतत ४० दिवस पाऊस पडला, त्यामुळे पिकांची वाढ झाली नाही. परिणामी पिकास उतारा चांगला मिळाला नाही. उत्पादनात घट झाली. दुबार पेरणी, बियाणाचे वाढते दर, मजुरांची मजुरी मशागतीचे, खतांचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली़ गेल्या वर्षी सोयाबीन ३० किलो बियाण्याचा दर १२५० रुपये होता़ यावर्षी दोन हजार पाचशे रुपयांचे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले़ गेल्याच वर्षी सोयाबीन बियाणाचा दर पाच हजारांपर्यंत जाऊन पोहोचला होता़ उत्पादन चांगले निघाल्याने शेतकरी समाधानी होता़ यावर्षी सोयाबीनचे सर्वच ठिकाणी उत्पादन घटले असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी आशा होती़ यावर्षी सोयाबीनचा दर तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत आहे़ गेल्या वर्षी घेवड्याचा दर दहा हजारांपासून अकरा हजारांपर्यंत होता़ तर यावर्षी तीन हजार रुपये क्विंटलचा दर आहे़ भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घटले आहे़ भाताचे उत्पादन मात्र चांगले मिळत आहे़ सोयाबीन, घेवडा, भुईमूग, उडीद, चवळी आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून, चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघाला नाही़ त्यामुळे खरिपाची शेती तोट्यात गेली आहे़ बाजारभाव नीचांकी मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आह़े़ (वार्ताहर)सोयाबीनचा गेल्या वर्षीचा दर प्रतिक्विंटल साडेतीन हजारांपासून पाच हजारांपर्यंत घेवडा यावर्षीचा दर प्रतिक्विंटल साडेदहा हजारांपासून अकरा हजारांपर्यंत सोयाबीनचा यावर्षीचा दर प्रतिक्विंटल तीन हजारांपासून तीन हजार दोनशे पर्यंत घेवडा यावर्षीचा दर प्रतिक्विंटल तीन हजारांपासून साडेतीन हजारांपर्यंत