शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

सातारा हद्दवाढीबाबत होकार-नकाराची घंटा!--सूर जुळेना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:15 IST

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत सातारा शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागांचे नेतृत्व करणाºया नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. विशेष म्हणजे हद्दवाढीला विरोध करणारे बहुतांश नेते

ठळक मुद्देस्थानिक जनतेचे म्हणणे जाणून घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत सातारा शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागांचे नेतृत्व करणाºया नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. विशेष म्हणजे हद्दवाढीला विरोध करणारे बहुतांश नेते हे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे आहेत. हद्दवाढीसाठी पालिका आग्रही आहे, तर हद्दवाढ नको म्हणून पंचायत समितीमधील सत्ताधारी आणि विरोधकही ठाम आहेत. या परिस्थितीत स्थानिक जनतेचे म्हणणे जाणून घेणे गरजेचे बनले आहे.

राज्य शासनाने बुधवार, दि. २२ मार्च २०१७ रोजी सातारा शहराच्या हद्दवाढीची प्रारंभी अधिसूचना काढली आहे. ३० दिवसांत हद्दवाढीविषयी नागरिकांच्या हरकती घेण्यात येणार होत्या. मात्र, आता पंचायत समितीच्या सत्ताधारी व विरोधकांनीही एकमत करत हद्दवाढीत येण्यास विरोध दर्शविला असून, शाहूपुरी व खेड-विलासपूर या स्वतंत्र नगरपंचायतींची मागणी केली आहे.

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या ३५ वर्षांपासून लोंबकळत पडला आहे. शहराचं एकूण क्षेत्रफळ ८.६१ चौरस किलोमीटर इतके आहे. शहरातील रस्ते, बाजारपेठा, भाजी मंडई, कचरा डेपो यांची सोय सातारा पालिकेने केली असली तरी सध्याच्या घडीला या सर्व सोयींचा उपभोग हद्दीबाहेरील नागरिकच मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.

शहराच्या विद्यमान हद्दीच्या बाजूने होणारा विकास व त्या अनुषंगाने लगतच्या परिसरातील वाढणारी लोकसंख्या व या वाढीव लोकसंख्येचा शहरातील सार्वजनिक सेवा सुविधांवर पडणारा वाढता ताण लक्षात घेता शहराची हद्दवाढ करणे अपरिहार्य आहे, असा प्रस्ताव सातारा पालिकेने नगरविकास विभागाला सादर केला होता.

या हद्दवाढीमध्ये करंजे व गोडोलीचा सध्या नगरपालिका क्षेत्रातील असणाºया भागाव्यतिरिक्त उर्वरित परिसर, दरे खुर्द (यवतेश्वर पायथा), शाहूपुरी, अजिंक्यतारा किल्ला, राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील खेड, कोडोली या गावांचा परिसर या हद्दवाढीच्या प्रस्तावात घेण्यात आला आहे.हद्दवाढ झाल्यास भरसाठ कर वाढतील, अशी धास्ती अनेकजणांना लागली आहे. तसेच बांधकाम करताना पालिकेच्या जाचक अटीही असल्यामुळे अनेकजण सातारा पालिकेच्या हद्दीत येण्यास इच्छूक नाहीत. ग्रामपंचायतीमध्येच आपण राहावे, असे अनेकजणांना वाटते.शहराची हद्दवाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या लगत ग्रामपंचायतींच्या तसेच त्रिशंकू भागात राहणाºया नागरिकांचे दैनंदिन व्यवहार हे शहराशी निगडित आहेत. लगतच्या ग्रामपंचायतीची हद्द शहरात समाविष्ट झाल्यास मोठ्या योजनाही राबवता येतील. शासनाकडून निधीही वाढून मिळेल. हद्दवाढीनंतर कर वाढेल, ही भीती अनाठायी आहे.- माधवी कदम, नगराध्यक्षा.शहराचे क्षेत्रफळही वाढणारसातारा शहराची सध्याची लोकसंख्या १ लाख २० हजारहद्दवाढीनंतर वाढणारी लोकसंख्या १ लाख ९८ हजारहद्दवाढीनंतर शहराचे होणारे एकूण क्षेत्रफळ १८ चौरस किलोमीटर