शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

सातारा हद्दवाढीबाबत होकार-नकाराची घंटा!--सूर जुळेना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:15 IST

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत सातारा शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागांचे नेतृत्व करणाºया नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. विशेष म्हणजे हद्दवाढीला विरोध करणारे बहुतांश नेते

ठळक मुद्देस्थानिक जनतेचे म्हणणे जाणून घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत सातारा शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागांचे नेतृत्व करणाºया नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. विशेष म्हणजे हद्दवाढीला विरोध करणारे बहुतांश नेते हे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे आहेत. हद्दवाढीसाठी पालिका आग्रही आहे, तर हद्दवाढ नको म्हणून पंचायत समितीमधील सत्ताधारी आणि विरोधकही ठाम आहेत. या परिस्थितीत स्थानिक जनतेचे म्हणणे जाणून घेणे गरजेचे बनले आहे.

राज्य शासनाने बुधवार, दि. २२ मार्च २०१७ रोजी सातारा शहराच्या हद्दवाढीची प्रारंभी अधिसूचना काढली आहे. ३० दिवसांत हद्दवाढीविषयी नागरिकांच्या हरकती घेण्यात येणार होत्या. मात्र, आता पंचायत समितीच्या सत्ताधारी व विरोधकांनीही एकमत करत हद्दवाढीत येण्यास विरोध दर्शविला असून, शाहूपुरी व खेड-विलासपूर या स्वतंत्र नगरपंचायतींची मागणी केली आहे.

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या ३५ वर्षांपासून लोंबकळत पडला आहे. शहराचं एकूण क्षेत्रफळ ८.६१ चौरस किलोमीटर इतके आहे. शहरातील रस्ते, बाजारपेठा, भाजी मंडई, कचरा डेपो यांची सोय सातारा पालिकेने केली असली तरी सध्याच्या घडीला या सर्व सोयींचा उपभोग हद्दीबाहेरील नागरिकच मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.

शहराच्या विद्यमान हद्दीच्या बाजूने होणारा विकास व त्या अनुषंगाने लगतच्या परिसरातील वाढणारी लोकसंख्या व या वाढीव लोकसंख्येचा शहरातील सार्वजनिक सेवा सुविधांवर पडणारा वाढता ताण लक्षात घेता शहराची हद्दवाढ करणे अपरिहार्य आहे, असा प्रस्ताव सातारा पालिकेने नगरविकास विभागाला सादर केला होता.

या हद्दवाढीमध्ये करंजे व गोडोलीचा सध्या नगरपालिका क्षेत्रातील असणाºया भागाव्यतिरिक्त उर्वरित परिसर, दरे खुर्द (यवतेश्वर पायथा), शाहूपुरी, अजिंक्यतारा किल्ला, राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील खेड, कोडोली या गावांचा परिसर या हद्दवाढीच्या प्रस्तावात घेण्यात आला आहे.हद्दवाढ झाल्यास भरसाठ कर वाढतील, अशी धास्ती अनेकजणांना लागली आहे. तसेच बांधकाम करताना पालिकेच्या जाचक अटीही असल्यामुळे अनेकजण सातारा पालिकेच्या हद्दीत येण्यास इच्छूक नाहीत. ग्रामपंचायतीमध्येच आपण राहावे, असे अनेकजणांना वाटते.शहराची हद्दवाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या लगत ग्रामपंचायतींच्या तसेच त्रिशंकू भागात राहणाºया नागरिकांचे दैनंदिन व्यवहार हे शहराशी निगडित आहेत. लगतच्या ग्रामपंचायतीची हद्द शहरात समाविष्ट झाल्यास मोठ्या योजनाही राबवता येतील. शासनाकडून निधीही वाढून मिळेल. हद्दवाढीनंतर कर वाढेल, ही भीती अनाठायी आहे.- माधवी कदम, नगराध्यक्षा.शहराचे क्षेत्रफळही वाढणारसातारा शहराची सध्याची लोकसंख्या १ लाख २० हजारहद्दवाढीनंतर वाढणारी लोकसंख्या १ लाख ९८ हजारहद्दवाढीनंतर शहराचे होणारे एकूण क्षेत्रफळ १८ चौरस किलोमीटर