शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डाळींबावर मर अन तेल्या रोगाच्या प्रादुभार्वाने

By admin | Updated: July 17, 2017 14:53 IST

अनुदानाची मागणी : झाडे जळून गेल्याने लाखोंचे नुकसान

आॅनलाईन लोकमतवाठार निंबाळकर(जि. सातारा), दि. १६ : मर अन तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फलटण तालुक्यातील अनेक गावांमधील डाळींबाच्या बागा जळून चालल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अथवा अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. डाळींबाचे भरघोस उत्पादन व उच्चांदी दर मिळत असल्याने तालुक्यातील निरगुडी, धुमाळवाडी, गिरवी, ताथवडा, उपळवे, जाधवनगर, दालवडी, वाठार निंबाळकर, वाखरी, धुळदेव, सोनवडी, सासकल, दुधेबावी, वडले, नाईकबोमवाडी, जावली, आंदरुढ, कुरवली, राजुरी, वेळोशी, सावंतवाडा, तावडी, ठाकुरकी, विडणी आदींसह इतर गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून मोठ्या रकमेची पिककर्ज घेऊन लागवड केली.लागवड करताना खड्डे खोदणे, रोपे खरेदी, लागवडीवेळी रासायनिक व सेंद्रीय खरे, मजुरी आदींचा खर्च मोठा असतो. लागवडीनंतर वारंवार औषधे फवारणी, झाडांची योग्य वाढ व्हावी यासाठी फवारणी तसेच इतर अन्नद्रव पुरवणे यामध्ये खुरपण व इतर मजुरी आदींचा खर्च डाळींबाला फळ येईपर्यंत लाखो रुपये खर्च होतात. त्यातही फळ आल्यावर फळांना उन, वारा, पावसाचा परिणाम होऊन नये यासाठी खर्च करावे लागतो.श्रम अन् पैसा खर्च करुनही डाळींबांना सध्या पंधरा ते चाळीस रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. या दरामध्ये डाळींबाची विक्री झाल्यास शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे दोन वर्षांचे कष्ट व बँकेचे व्याज व कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. फलटण तालुक्यातील सर्वच गावांमधील डाळींबाच्या बागांवर तेल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. उदारीवर खते व औषधे आणली. तसेच मजुरांच्या मजुरीसाठी उसनवारी पैसा आणून खर्च केला. पंधरा ते चाळीस रुपये किलो दराने डाळींब विकल्यास दुसऱ्यांचे पैसे कसे द्यायचे हाही प्रश्नच आहे. - सचिन जगतापशेतकरी उपळवेतीन एकर बाग खाकधुळदेव येथील शेतकरी शुभम ननावरे यांनी तीन वर्षांपासून लाखो रुपये खर्च करुन डाळींब पिकाचे उत्पादन घेतले. मात्र, तेल्या व मर रोगामुळे तीन एकरातील बाग जळून खाक झाली आहे.