शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

डाळींबावर मर अन तेल्या रोगाच्या प्रादुभार्वाने

By admin | Updated: July 17, 2017 14:53 IST

अनुदानाची मागणी : झाडे जळून गेल्याने लाखोंचे नुकसान

आॅनलाईन लोकमतवाठार निंबाळकर(जि. सातारा), दि. १६ : मर अन तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फलटण तालुक्यातील अनेक गावांमधील डाळींबाच्या बागा जळून चालल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अथवा अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. डाळींबाचे भरघोस उत्पादन व उच्चांदी दर मिळत असल्याने तालुक्यातील निरगुडी, धुमाळवाडी, गिरवी, ताथवडा, उपळवे, जाधवनगर, दालवडी, वाठार निंबाळकर, वाखरी, धुळदेव, सोनवडी, सासकल, दुधेबावी, वडले, नाईकबोमवाडी, जावली, आंदरुढ, कुरवली, राजुरी, वेळोशी, सावंतवाडा, तावडी, ठाकुरकी, विडणी आदींसह इतर गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून मोठ्या रकमेची पिककर्ज घेऊन लागवड केली.लागवड करताना खड्डे खोदणे, रोपे खरेदी, लागवडीवेळी रासायनिक व सेंद्रीय खरे, मजुरी आदींचा खर्च मोठा असतो. लागवडीनंतर वारंवार औषधे फवारणी, झाडांची योग्य वाढ व्हावी यासाठी फवारणी तसेच इतर अन्नद्रव पुरवणे यामध्ये खुरपण व इतर मजुरी आदींचा खर्च डाळींबाला फळ येईपर्यंत लाखो रुपये खर्च होतात. त्यातही फळ आल्यावर फळांना उन, वारा, पावसाचा परिणाम होऊन नये यासाठी खर्च करावे लागतो.श्रम अन् पैसा खर्च करुनही डाळींबांना सध्या पंधरा ते चाळीस रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. या दरामध्ये डाळींबाची विक्री झाल्यास शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे दोन वर्षांचे कष्ट व बँकेचे व्याज व कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. फलटण तालुक्यातील सर्वच गावांमधील डाळींबाच्या बागांवर तेल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. उदारीवर खते व औषधे आणली. तसेच मजुरांच्या मजुरीसाठी उसनवारी पैसा आणून खर्च केला. पंधरा ते चाळीस रुपये किलो दराने डाळींब विकल्यास दुसऱ्यांचे पैसे कसे द्यायचे हाही प्रश्नच आहे. - सचिन जगतापशेतकरी उपळवेतीन एकर बाग खाकधुळदेव येथील शेतकरी शुभम ननावरे यांनी तीन वर्षांपासून लाखो रुपये खर्च करुन डाळींब पिकाचे उत्पादन घेतले. मात्र, तेल्या व मर रोगामुळे तीन एकरातील बाग जळून खाक झाली आहे.