शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात..: माणमधून ५३ तर खटावमधून ३ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:03 IST

चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर

सागर गुजर ।सातारा : चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर शेतकºयांनी भर दिला आहे. माण तालुक्यातून ५३ तर खटाव तालुक्यातून ३ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले असून, या प्रस्तावांच्या मंजुरीनंतरच दुष्काळी जनतेची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

माण तालुक्यातील दहिवडी, मार्डी, म्हसवड, कुकुडवाड, आंधळी, शिंगणापूर, मलवडी, गोंदवले बुद्रुक या मंडलांतील ५३ गावांमध्ये चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात विविध सामाजिक व सहकारी संस्थांमार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. खटाव तालुक्यातील कातरखटाव व मायणी या दोन मंडलांतील दोन गावांत चारा छावणी सुरू करण्यासाठी ३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

दरम्यान, शासनाने मागील आठवड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी भागातील परिस्थितीचा अंदाज घेऊन चारा छावणी मागणीचे प्रस्ताव शासनाने मागवून घेतले आहेत.

माण तालुक्यातील पांगरी, वडगाव, बिजवडी, जाधववाडी, मोगराळे, येळेवाडी, बिजवडी, बिदाल, बोडके, जाधववाडी, बिरोबानगर पांगरी, तोंडले, भाटकी, माळवाडी, हवालदारवाडी, इंजबाब, संभूखेड, भालवडी, मार्डी, वाकी, हिंगणी, म्हसवड, पळसावडे, दिवड, कुकुडवाड, टाकेवाडी, आंधळी, पांढरवाडी, कासरवाडी, शेनवडी, पानवण, पाचवड, अनभुलेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, राजवडी, बिजवडी, मलवडी, पिंगळी बुद्रुक, पिंपरी, पळशी, गोंदवले खुर्द या गावांमध्ये तसेच खटाव तालुक्यातील एनकूळ, हिवरवाडी या गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत.

या प्रस्तावांची तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या वतीने तपासणी होणार आहे. हे प्रस्ताव संबंधित तालुक्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. योग्य प्रस्ताव प्रांत कार्यालयामार्फत जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार आहेत.२८ हजार ३७६ पशुधन बाधितदुष्काळी तालुक्यातील २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहेत. शेतकरी मोठ्या कष्टाने पशुधन जगवित असून, चारा छावण्या कधी सुरू होणार? याकडे दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. 

माण तालुक्यावर नेहमीच पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या पावसाळ्यातही अत्यल्प पाऊस झाला असल्याने जनावरे जगविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात.- संभाजी कदम, दहिवडीदुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी जनावरे घेऊन बाजार गाठू लागले आहेत.