शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात..: माणमधून ५३ तर खटावमधून ३ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:03 IST

चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर

सागर गुजर ।सातारा : चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर शेतकºयांनी भर दिला आहे. माण तालुक्यातून ५३ तर खटाव तालुक्यातून ३ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले असून, या प्रस्तावांच्या मंजुरीनंतरच दुष्काळी जनतेची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

माण तालुक्यातील दहिवडी, मार्डी, म्हसवड, कुकुडवाड, आंधळी, शिंगणापूर, मलवडी, गोंदवले बुद्रुक या मंडलांतील ५३ गावांमध्ये चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात विविध सामाजिक व सहकारी संस्थांमार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. खटाव तालुक्यातील कातरखटाव व मायणी या दोन मंडलांतील दोन गावांत चारा छावणी सुरू करण्यासाठी ३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

दरम्यान, शासनाने मागील आठवड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी भागातील परिस्थितीचा अंदाज घेऊन चारा छावणी मागणीचे प्रस्ताव शासनाने मागवून घेतले आहेत.

माण तालुक्यातील पांगरी, वडगाव, बिजवडी, जाधववाडी, मोगराळे, येळेवाडी, बिजवडी, बिदाल, बोडके, जाधववाडी, बिरोबानगर पांगरी, तोंडले, भाटकी, माळवाडी, हवालदारवाडी, इंजबाब, संभूखेड, भालवडी, मार्डी, वाकी, हिंगणी, म्हसवड, पळसावडे, दिवड, कुकुडवाड, टाकेवाडी, आंधळी, पांढरवाडी, कासरवाडी, शेनवडी, पानवण, पाचवड, अनभुलेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, राजवडी, बिजवडी, मलवडी, पिंगळी बुद्रुक, पिंपरी, पळशी, गोंदवले खुर्द या गावांमध्ये तसेच खटाव तालुक्यातील एनकूळ, हिवरवाडी या गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत.

या प्रस्तावांची तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या वतीने तपासणी होणार आहे. हे प्रस्ताव संबंधित तालुक्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. योग्य प्रस्ताव प्रांत कार्यालयामार्फत जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार आहेत.२८ हजार ३७६ पशुधन बाधितदुष्काळी तालुक्यातील २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहेत. शेतकरी मोठ्या कष्टाने पशुधन जगवित असून, चारा छावण्या कधी सुरू होणार? याकडे दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. 

माण तालुक्यावर नेहमीच पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या पावसाळ्यातही अत्यल्प पाऊस झाला असल्याने जनावरे जगविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात.- संभाजी कदम, दहिवडीदुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी जनावरे घेऊन बाजार गाठू लागले आहेत.