शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात..: माणमधून ५३ तर खटावमधून ३ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:03 IST

चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर

सागर गुजर ।सातारा : चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर शेतकºयांनी भर दिला आहे. माण तालुक्यातून ५३ तर खटाव तालुक्यातून ३ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले असून, या प्रस्तावांच्या मंजुरीनंतरच दुष्काळी जनतेची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

माण तालुक्यातील दहिवडी, मार्डी, म्हसवड, कुकुडवाड, आंधळी, शिंगणापूर, मलवडी, गोंदवले बुद्रुक या मंडलांतील ५३ गावांमध्ये चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात विविध सामाजिक व सहकारी संस्थांमार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. खटाव तालुक्यातील कातरखटाव व मायणी या दोन मंडलांतील दोन गावांत चारा छावणी सुरू करण्यासाठी ३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

दरम्यान, शासनाने मागील आठवड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी भागातील परिस्थितीचा अंदाज घेऊन चारा छावणी मागणीचे प्रस्ताव शासनाने मागवून घेतले आहेत.

माण तालुक्यातील पांगरी, वडगाव, बिजवडी, जाधववाडी, मोगराळे, येळेवाडी, बिजवडी, बिदाल, बोडके, जाधववाडी, बिरोबानगर पांगरी, तोंडले, भाटकी, माळवाडी, हवालदारवाडी, इंजबाब, संभूखेड, भालवडी, मार्डी, वाकी, हिंगणी, म्हसवड, पळसावडे, दिवड, कुकुडवाड, टाकेवाडी, आंधळी, पांढरवाडी, कासरवाडी, शेनवडी, पानवण, पाचवड, अनभुलेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, राजवडी, बिजवडी, मलवडी, पिंगळी बुद्रुक, पिंपरी, पळशी, गोंदवले खुर्द या गावांमध्ये तसेच खटाव तालुक्यातील एनकूळ, हिवरवाडी या गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत.

या प्रस्तावांची तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या वतीने तपासणी होणार आहे. हे प्रस्ताव संबंधित तालुक्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. योग्य प्रस्ताव प्रांत कार्यालयामार्फत जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार आहेत.२८ हजार ३७६ पशुधन बाधितदुष्काळी तालुक्यातील २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहेत. शेतकरी मोठ्या कष्टाने पशुधन जगवित असून, चारा छावण्या कधी सुरू होणार? याकडे दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. 

माण तालुक्यावर नेहमीच पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या पावसाळ्यातही अत्यल्प पाऊस झाला असल्याने जनावरे जगविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात.- संभाजी कदम, दहिवडीदुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी जनावरे घेऊन बाजार गाठू लागले आहेत.