शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘वाई’चा हात!

By admin | Updated: April 14, 2016 20:49 IST

२५० विद्यार्थ्यांना भोजन निवासासह मोफत शिक्षण : सुमारे चार कोटींची सामाजिक योजना; वाईच्या जनता शिक्षण संस्थेची अनोखी बांधिलकी

भुर्इंज : दुष्काळाचे चटके आता भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसू लागले आहेत. पाससाठी पैसे नाहीत म्हणून कोण आत्महत्या करतंय तर कोणी शिक्षण सोडून जगण्याच्या लढाईसाठी परागंदा होत आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्वप्नं पूर्ण व्हावीत, यासाठी वाईच्या जनता शिक्षण संस्थेने ११ वी, १२ वीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तब्बल २५० विद्यार्थ्यांची शिक्षणासह सर्व व्यवस्था मोफत केली आहे. फक्त कपडे व आवश्यक प्रमाणपत्रांसह या आम्ही तुमचे भविष्य घडवू, असे आवाहन त्यांनी केले आहे.दुष्काळग्रस्त २५० विद्यार्थ्यांचा २ वर्षांसाठी संपूर्ण शैक्षणिक सुविधेसह मोफत सांभाळ करण्याची योजना वाईच्या जनता शिक्षण संस्थेने सुरु केली आहे. ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी प्रत्यक्ष कार्यवाहीलाही प्रारंभ केला आहे. या योजनेसाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी विदर्भ, मराठवाडा आणि धुळे ते कवठे महांकाळसह दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची निवासाची सोय करण्यासाठी २ कोटी रुपये खर्चाचे वसतिगृह २ महिन्यात उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला. फक्त कपडे व आवश्यक प्रमाणपत्रांसह विद्यार्थ्यांनी वाईच्या किसन वीर महाविद्यालयात २ वर्षांसाठी यावे, त्यांना औषधे, कपडे, भोजन, निवास, पुस्तके, शालेय साहित्य आणि व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व सोयी मोफत पुरविण्यासाठी आणखी २ वर्षांत एकूण ४ कोटींचा खर्च जमा करणार आहे, असे प्रतापराव भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनहीया विद्यार्थ्यांना जलदगतीने स्वत:च्या पायावर उभा राहता यावे, यासाठी विविध भरतीसाठी प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पोलिस भरती, सैन्य भरतीच्या प्रशिक्षणासाठी दोन अधिकारी नेमले जाणार आहेत. अनुभवी व कर्तव्यदक्ष प्राध्यापक वर्ग आणि सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांची ज्ञानाची आणि त्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी संस्था समर्थ आहे. या उपक्रमासाठी मदत करणाऱ्यांची वाणवा भासणार नाही, असाही विश्वास भोसले यांनी व्यक्त केला आहे.