शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘वाई’चा हात!

By admin | Updated: April 14, 2016 20:49 IST

२५० विद्यार्थ्यांना भोजन निवासासह मोफत शिक्षण : सुमारे चार कोटींची सामाजिक योजना; वाईच्या जनता शिक्षण संस्थेची अनोखी बांधिलकी

भुर्इंज : दुष्काळाचे चटके आता भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसू लागले आहेत. पाससाठी पैसे नाहीत म्हणून कोण आत्महत्या करतंय तर कोणी शिक्षण सोडून जगण्याच्या लढाईसाठी परागंदा होत आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्वप्नं पूर्ण व्हावीत, यासाठी वाईच्या जनता शिक्षण संस्थेने ११ वी, १२ वीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तब्बल २५० विद्यार्थ्यांची शिक्षणासह सर्व व्यवस्था मोफत केली आहे. फक्त कपडे व आवश्यक प्रमाणपत्रांसह या आम्ही तुमचे भविष्य घडवू, असे आवाहन त्यांनी केले आहे.दुष्काळग्रस्त २५० विद्यार्थ्यांचा २ वर्षांसाठी संपूर्ण शैक्षणिक सुविधेसह मोफत सांभाळ करण्याची योजना वाईच्या जनता शिक्षण संस्थेने सुरु केली आहे. ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी प्रत्यक्ष कार्यवाहीलाही प्रारंभ केला आहे. या योजनेसाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी विदर्भ, मराठवाडा आणि धुळे ते कवठे महांकाळसह दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची निवासाची सोय करण्यासाठी २ कोटी रुपये खर्चाचे वसतिगृह २ महिन्यात उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला. फक्त कपडे व आवश्यक प्रमाणपत्रांसह विद्यार्थ्यांनी वाईच्या किसन वीर महाविद्यालयात २ वर्षांसाठी यावे, त्यांना औषधे, कपडे, भोजन, निवास, पुस्तके, शालेय साहित्य आणि व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व सोयी मोफत पुरविण्यासाठी आणखी २ वर्षांत एकूण ४ कोटींचा खर्च जमा करणार आहे, असे प्रतापराव भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनहीया विद्यार्थ्यांना जलदगतीने स्वत:च्या पायावर उभा राहता यावे, यासाठी विविध भरतीसाठी प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पोलिस भरती, सैन्य भरतीच्या प्रशिक्षणासाठी दोन अधिकारी नेमले जाणार आहेत. अनुभवी व कर्तव्यदक्ष प्राध्यापक वर्ग आणि सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांची ज्ञानाची आणि त्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी संस्था समर्थ आहे. या उपक्रमासाठी मदत करणाऱ्यांची वाणवा भासणार नाही, असाही विश्वास भोसले यांनी व्यक्त केला आहे.